मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नगांव बारी परिसरात फटाक्यांची दारू घेऊन निघालेली भरधाव मालमोटार चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलाचे कठडे तोडून उलटला. सुदैवाने यावेळी दारुचा स्फोट न झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

शुक्रवारी पहाटे शिरपूर येथून फटाक्यांची दारू घेऊन मालमोटार निघाली होती. नगांव बारी परिसरात दोन उड्डाण पुलाला जोडणाऱ्या संरक्षक भिंतीचे कठडे तोडून मालमोटार दोन पुलामधील रिकाम्या जागेत कोसळला. त्यात दोघे जखमी झाले.

या अपघातात फटाक्यातील दारुचा स्फोट न झाल्याने मोठा अनर्थ टळला. अपघाताचा आवाज घेऊन स्थानिकांनी धाव घेतील. त्यांनी जखमींना उपचारार्थ रुग्णालयाकडे हलविले.