विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी समन्वय समितीची बैठक बोलवावी म्हणून पक्षाने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले. परंतु, आठ दिवसानंतरही बैठक बोलविण्यात आली नसल्याची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. तर, ही बाब उपमुख्यमंत्र्याच्या निदर्शनास आणून द्यावी लागली. मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून बहुदा बुधवारी समन्वय समितीची बैठक होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते नारायण राणे मुख्यमंत्र्यांवर तोफ डागत असताना मित्रपक्ष राष्ट्रवादीनेही जागा वाटपाच्या मुद्यावरून त्यांना अडचणीत आणणे सुरू केले आहे.