नगर-मनमाड रस्त्यावर राहुरी शहरात एक जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात आठ जण ठार झाले. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सर्व जण राहुरी तालुक्यातील वरवंडी गावचे शेतकरी कुटुंबातील आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, जीप भरधाव वेगात होती. चालकाचा ताबा सुटून ती झाडावर आदळली आणि रस्त्याच्या खाली गेली. अपघात इतका भीषण होता की जीपमधील सहा जण जागीच ठार झाला. तर उर्वरित दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.