महाड तालुक्यातील शिवथरघळ परिसरात एका शेतकऱ्यानं जनावरांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी शेतात जाळं लावलं होतं. त्यात बिबट्या अडकला होता. त्याची तब्बल १२ तासांनी सुटका करण्यात बोरीवली उद्यानातील अधिकाऱ्यांना यश आलं आहे. महाड तालुक्यातील सुनेभाऊ गावात जनावरं शेतातील पिकाची नासधूस करतात. त्यामुळं पिकाचं संरक्षण करण्यासाठी लक्ष्मण मोरे यांनी शेतात जाळे लावलं होतं. या जाळ्यात मंगळवारी संध्याकाळी बिबट्या अडकला. या बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. याबाबत माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पथकाला पाचारण केले. तब्बल १२ तास जाळ्यात अडकलेल्या बिबट्याची दुसऱ्या दिवशी पहाटे पाचच्या सुमारास सुटका करण्यात आली.सुनेभाऊ गावातील जंगलभागात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून रंगत होती.