येथून नजीक असलेल्या बोरगाव मंजूजवळ मंगळवारी एका भरधाव कंटेनरने कोळंबी येथील पाच महिला मजूर व एका बालकास चिरडल्याने या भीषण अपघातात सहा जण जागीच ठार झाले. अपघातानंतर कंटेनरचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता संतप्त जमावाने कंटेनरचा पाठलाग करून कुरणखेडजवळ तो पेटवून दिला. दरम्यान, कंटेनरचालकाने पळून जाून बोरगाव मंजू पोलिसांच्या स्वाधीन केले.  मूर्तिजापूर येथून अकोल्याकडे कंटेनर भरधाव वेगाने जात होता. या कंटेनरने या पाच महिला व बालकास चिरडले. मृतांमध्ये कोळंबी येथील ताई जानराव तळोकार (३०), गौरव (५), रेखा संजय तळोकार (३०), विजया हरीदास मानकर (१८), सुनिता गणेश देवके (३५), व नंदा मोतिराम गाडगे(३५) यांचा समावेश आहे. कंटेनरने त्या पाच जणांना जागीच चिरडल्यावर घटनास्थळी रक्त अन् मासाचा चिखल पाहून जमाव संतप्त झाला. जमावाने कंटेनर जाळून टाकल्याने मूर्तिजापूर-अकोला मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.