विरोधी स्वभावाचे लोक एकमेकांकडे अधिक आकर्षित होतात असे म्हणतात. काजोल- अजयकडे बघून ही गोष्ट किती खरी आहे हे लगेच कळते. अजय देवगण हा त्याच्या स्वतःमध्येच एक सुपरस्टार आहे असे म्हटले तरी खोटे ठरणार नाहीत. त्याने आतापर्यंत सगळ्या धाटणीचे सिनेमे केले आहेत. मग ते ‘गोलमाल’सारखे विनोदी सिनेमे असो किंवा ‘भगतसिंग’सारखा गंभीर सिनेमा. तर दुसरीकडे काजोलने बॉलिवूडमध्ये स्वतःची स्वतंत्र ओळख बनवली आहे. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’ आणि ‘कभी खुशी कभी कम’ या सिनेमांमुळे काजोलला ओळख मिळाली. पण खऱ्या आयुष्यात ते पुर्णपणे वेगळे आहेत. काजोल ही तिच्या मजा मस्तीसाठी आणि सततच्या बडबडीसाठी प्रसिद्ध आहे तर अजय तेवढाच शांत आणि कणखर आहे.

काजोल आणि अजयने २४ फेब्रुवारी १९९९ मध्ये लग्न केले. आज त्यांच्या लग्नाला १८ वर्ष पूर्ण झाली. काजोलने त्यांच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी एक फोटोही सोशल मीडियावर शेअर केला. दोघांना न्यासा आणि युग ही दोन मुले आहेत. ते दोघं सार्वजनिक ठिकाणी एकमेकांबद्दलच्या प्रेमाबद्दल भरभरून बोलत नसले तरी एकमेकांच्या पाठी ते नेहमीच खंबीरपणे उभे असतात. अशा जोडप्यांकडे पाहून आजही खरे प्रेम अस्तित्वात आहे असा विश्वास अनेकांचा वाटतो.

२०१६ मध्ये दिवाळीमध्ये आलेल्या ‘शिवाय’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये यामध्ये झालेल्या वादांमध्ये काजोलने आपल्या मित्राला सोडून नवऱ्याचीच खंबीरपणे बाजू घेतली.

जेव्हा करण जोहरने त्याची आणि काजोलची मैत्री कशी तुटली हे ट्विटरवर सांगितले तेव्हाही अजयने काजोलची ठामपणे बाजू घेतलेली.
काजोल आणि अजयने ‘यू मी और हम’, ‘प्यार तो होना ही था’, ‘इश्क’, ‘गुंडाराज’, ‘राजू चाचा’ यांसारख्या अनेक सिनेमांत एकत्र काम केले आहे.

kajol-srk-gauri-aryan