बॉलिवूडमध्ये दिर्घकाळासाठी टिकून राहायचे असेल तर कोणत्याही अभिनेत्रीला सडपातळ व्हावच लागतं. या चंदेरी दुनियेतला हा अलिखित नियमच आहे. परिणीतीनेही काही दिवसांपूर्वी तिचे वजन कमी केले होते. वजन कमी करण्याचा फायदा तिला लगेच मिळालाही. ‘ढिशूम’ सिनेमातलं ‘जानेमन आह्…’ हे आयटम साँग तिला करायला मिळालं. तिच्या आयुष्यातलं हे पहिलं आयटम साँग होतं. परिणीतीनंतर आता वजन कमी करण्याच्या स्पर्धेत दबंग गर्ल सोनाक्षीही उतरली आहे. तिनेही म्हणे आता वजन घटवले आहे. पण तिच्या वजन कमी करण्याचे रहस्य तरी काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात येत आहे. खुद्द सोनाक्षीने आता याचे उत्तर दिले आहे.

वजन कमी करण्याचं गुपीत सांगताना ती म्हणते,‘मी सुरुवातीला जंक फूड खाणं पूर्णपणे थांबवलं. मी ‘नूर’ सिनेमासाठी शूटिंग सुरू केलं तेव्हा मी माझ्या व्यग्र वेळापत्रकामुळे फारच त्रासले होते. तेव्हा मी पहिल्यांदा बाहेरचं जंक फूड खाणं थांबवलं आणि माझ्या आईच्या हातचं जेवण खायला सुरूवात केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, त्याचा परिणाम ताबडतोब दिसू लागला.’

काही दिवसांपूर्वी सोनाक्षीला तिच्या स्थूलपणामुळे सोशल मीडियावर बऱ्याचदा निगेटिव्ह कमेंट्स वाचायला मिळायच्या. पण ती निराश न होता त्यावर मात करून तिने तिचे वजन कमी करून दाखवले. या सर्व कमेंट्सबद्दलचा राग व्यक्त करताना ती म्हणते,‘ मी माझ्या मनातल्या नकारात्मक उर्जेला पूर्णपणे बंद करुन टाकले आहे. चुकीच्या मतांना मी जास्त महत्त्व देत नाही.

मी शाळेत असतानाही जाड होते. पण, मला मी एक व्यक्ती म्हणून खूप आवडते. मी सिनेसृष्ट्रीत आल्यापासून ९० किलो वजनाची होती. आता माझे वजन ६० किलो आहे. हे मी माझ्या जिद्दीने आणि मेहनतीने केले आहे. सहसा मी कोणत्याही नकारात्मक गोष्टींना माझ्या आयुष्यात स्थानच देत नाही. तिच्या या वेट लॉसच्या रहस्याचा फायदा आपल्यालाही नक्कीच होऊ शकतो. हो ना?

 

https://www.instagram.com/p/BL_Q4m7j2we/