प्रेमात कधी काय होईल काही सांगता येत नाही. प्रेमात तुम्ही कधी खूप आनंदी असता तर कधी नक्की आपल्यासोबत काय चालले आहे याबद्दल स्वतःलाच प्रश्न विचारता. ब्रेकअप झाल्यावर अनेकजण स्वतःचा आत्मविश्वास हरवून बसता. पण अशा वेळी तुम्ही हताश न होता त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला पाहिजे. तुम्हाला माहित आहे का की, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचादेखील प्रेमभंग झाला आहे. पण तो या प्रेमभंगात तुटला नाही तर त्याने नव्याने स्वतःला शोधले. क्रिकेटपटू विराटबद्दल असे म्हटले जाते की, माजी मिस इंडिया सारा जेन डायसला तो डेट करत होता.

सारा आणि विराट यांची ओळख एका पार्टीमध्ये झालेली. त्यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि नंतर अनेक महिने ते एकत्रही होते. या दोघांनी ही गोष्ट कधी मान्य केली नाही. पण सुरूवातीला सगळे आलबेल असताना नंतर मात्र त्यांच्या नात्यात कडवटपणा येऊ लागला आणि साराने विराटला सोडून दिले. पण आपल्या खासगी आयुष्यात होणाऱ्या वादळांचा परिणाम विराटने कधीच खेळावर पडू दिला नाही. सध्या विराट बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

कोहलीच्या खेळाबद्दल बोलायचे झाले तर १९५ मॅचमध्ये ३२ वेळा नाबाद राहिलेल्या कोहलीचा स्ट्राइक रेट ९१.७२ आहे. त्याने आतापर्यंत ८५८७ धावा केल्या आहेत. या धावांमध्ये ४४ अर्धशतक आणि ३० शतकांचा समावेश आहे. कसोटी सामन्यांबद्दल बोलायचे तर कसोटी सामन्यांमध्ये कोहलीचा स्ट्राइक रेट ५६.०२ आहे. त्याने ४६५८ धावा केल्या आहेत. या धावांमध्ये १७ शतक आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. या हरहुन्नरी फलंदाजाने ५० टी-२० सामने खेळले. टी-२० मध्ये त्याने आतापर्यंत १८३० धावा केल्या.