भिवंडीतील गैबीनगरमध्ये आज सकाळी दुमजली इमारत खचल्याची घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत नऊ जण दगावल्याचे वृत्त आहे. सदर इमारतीत आठ ते नऊ कुटुंब राहत होती. तेथे जवळपास ३०-३५ जण वास्तव्यास होते. दरम्यान, या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर आहे. नऊ जणांना ठाण्यातील एका रुग्णालयात हलविण्यात आले असून इतर जखमींना इंदिरा गांधी शासकिय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. तहसीलदार वैशाली लंभाते त्यांच्या संपूर्ण टीमसह घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलांच्या गाड्या मदतकार्यासाठी पोहचल्या आहेत. मात्र, पावसामुळे मदतकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, शनिवारी सकाळी गिरगावातील भटवाडी येथील पाठारे इमारतीचा काही भाग कोसळला. बचावपथकाच्या अधिका-यांनी तीन रहिवाशांची सुखरूपरित्या सुटका केल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. #SpotVisuals: Five dead, many feared trapped under the debris after a 3-storey building collapses in Bhiwandi,Mumbai pic.twitter.com/BTWYxQdfPD — ANI (@ANI_news) July 31, 2016 UPDATE: 2 dead, more than 10 people feared trapped under the debris after a three-storey building collapsed in Bhiwandi area in Mumbai. — ANI (@ANI_news) July 31, 2016