मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
- इंग्लिश भाषेच्या स्वमूल्यमापनाचे नवे सॉफ्टवेअर विकसित
- जालना लोकसभा मतदारसंघाच्या आढाव्यासाठी काँग्रेसची आज बैठक
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कवरच व्हावे, यासाठी कायदा हातात घेण्याच्या शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या वक्तव्याने या प्रकरणाला आता वेगळेच वळण लाभले आहे. कायदा हातात घेण्याची कोणी भाषा केल्यास सरकार कारवाई करेल, असा इशारा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला तर लोकसभेचे अध्यक्षपद भूषविलेल्यांकडून अशा विधानांची अपेक्षा नाही, अशी टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केली आहे. तर, जोशी यांनी केलेले वक्तव्य प्रक्षोभक आहे का, हे तपासण्याच्या सूचना सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्क येथे व्हावे, अशी मागणी बाळासाहेबांच्या निधनानंतर लगेचच मनोहर जोशी यांनीच सर्वप्रथम केली, तेव्हापासून बाळासाहेबांच्या स्मारकाचा नवा वाद मुंबईत उफाळला आहे. त्यातच रविवारी नाशिकमध्ये बोलताना जोशी यांनी या मागणीचा पुनरुच्चार करताना 'कायदा हातात घ्या' असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जोशी यांचे नाव न घेता टीका केली. सरकार कोणालाही कायदा हातात घेऊ देणार नाही. वेळ प्रसंगी योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. तर, शिवसेनाप्रमुखांचे स्मारक हा संवेदनशील विषय आहे. त्यावर सर्व नेत्यांनी एकत्र बसून त्यावर तोडगा काढावा, असे मत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी व्यक्त केले. जोशी यांचे नाशिकमधील वक्तव्य तपासून पाहण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.
लोकसभेचे अध्यक्षपद भूषविलेल्या व्यक्तीकडून असे वक्तव्य अपेक्षित नाही, असा टोलाही प्रदेश काँग्रेसने मारला असून, त्यांच्या मालकीच्या कोहिनूर मिलच्या जमिनीवर स्मारक व्हावे, या मागणीला बगल देण्यासाठीच ते शिवाजी पार्कसाठी आग्रही आहेत, अशी कोपरखळीही मारली आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाच्या मुद्दय़ाचे राजकारण सुरू झाले आहे, असा आरोपही प्रदेश काँग्रेसने केला आहे.




















कैलासवासी राजकीय नेत्त्यांची स्मारके उभारणे हा जन्म मरणाचा प्रश्न काही राजकीय पक्षांनी निर्माण करून इतर जीवंत नागरिकांना मानसिक त्रास देत आहेत. नेत्यांचे चरित्राचे आचरण न करता त्यांच्या चित्रांची पुजा करणे हे खरे स्मारक नाही. मृत्यु अगोदर बाळासाहेबांनी शिवसैनिकाना व भारतियांना उद्देशून सांगितले होते की त्यांच्या तब्येतीपेक्षा भारताची तब्ब्येत काँग्रेसच्या कॅन्सर ने बिघडलेली आहे.सर्वांनी हा काँग्रेसचा कॅन्सर मुळासकट उखडून टाका . चला कामाला लागा. विनाकरण व्यर्थ गोष्टीत ताकत घालवू नका.
स्मारकाची मागणी योग्य कि आयोग्य हे नंतर पण पंत एक गोष्ट विसरले कि आता काही भानगड झाली तर त्यांना वाचवायला साहेब नाहीयेत.
कायदा हातात घ्या म्हणजे नक्की कोणता कायदा हे कोणाच्याही बापाला कायद्याने ठरविता येणार नाही.जोशी यांनी केलेले वक्तव्य प्रक्षोभक आहे का, हे तपासण्याच्या सूचना सरकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. म्हणजे १०-१२ वर्षांची निश्चिंती झाली.गुरु दक्षिणा म्हणून कोहीनूर मिलचा रस्त्यालगतचा काही भाग स्मारकास देऊन टाका आणि आदर्श निर्माण करा..जोशी सर, शिवसैनिक तुमच्यावर जाम खुष होतिल.