२००८ चा पहिला आयपीएल जिंकणारा संघ म्हणजे राजस्थान रॉयल्स. १ जून २००८ या संघाने शेन वॉनच्या नेतृत्त्वाच्या जोरावर चैन्नई सुपर किंग्सचा पराभव करत इतिहास रचला. २००९ नंतर या संघामध्ये अनेक बदल झाले. पुढे काही वर्ष राजस्थानच्या संघाला प्लेफॉर्म्समध्ये जागा मिळवता आली नाही. या काळात संघाची कामगिरी काहीशी समाधानकारक होती. २०१३ मध्ये राजस्ठान रॉयल्सच्या खेळाडूंवर फिक्सिंग आणि बेटींगचा आरोप करण्यात आले. २०१५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निर्णय दिला. २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांच्या कालावधीसाठी राजस्थान रॉयल्सवर बंदी आली. २०१८ मध्ये ही बंदी हटवण्यात आली. पुढील दोन-तीन वर्षांमध्ये संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यानंतर लिलावामार्फत नवे खेळाडू संघामध्ये सामील झाले. २०२२च्या पंधराव्या हंगामामध्ये संघाने चांगला खेळ दाखवला. पण अंतिम सामन्यामध्ये त्यांचा पराभव झाला. २०२२ पासून संजू सॅमसन हा राजस्ठान रॉयल्सचा कर्णधार आहे. शिल्पा शेट्टी-कुंद्रा, लचलान मर्डोक आणि गॅरी कार्डिनेल यांच्याकडे संघाची मालकी आहे.Read More
Varanasi Cricket Stadium: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काशीतील क्रिकेट स्टेडियमची पायाभरणी करणार आहेत. देशाला ५४वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मिळणार आहे.…