ज्या परिमंडळात परवाने नाहीत तेथे थ्री जी सेवेसाठी ग्राहक नोंदवू नयेत, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी व्होडाफोन आणि आयडिया या अन्य दूरसंचार कंपन्यांवरही बजावले. सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकारचा आदेश गुरुवारी भारती एअरटेल या मोबाइल कंपनीलाही दिला होता. एअरटेलला २४ तासांत अशी सेवा बंद करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने बजावल्यानंतर शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर कंपन्यांनाही मज्जाव केला.