शेतीप्रधान देशाचे महत्वलक्षात घेता आणि मान्सूनच्या लांबणीमुळे देशभरात सिंचनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘पंतप्रधान कृषि सिंचन योजना’ राबविणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पादरम्यान केली.
देशाच्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) पैकी १/६ वाटा हा शेतीचा आहे त्यामुळे देशातील शेतीच्या विकासावर भर देण्याच्या दृष्टीने आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज असल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आणि शेतीच्या दृष्टीने पुढील तरतूदी केल्या आहेत-

* देशभरात ‘पंतप्रधान कृषि सिंचन योजना’ राबविणार
*  देशभरात माती परिक्षण प्रयोगशाळेसाठी ५६ कोटी रूपयांची तरतूद
* शेतीच्या नव्या वाहिनीसाठी १०० कोटींची तरतूद
* बाजारसमित्यांना पर्याय म्हणून खासगी मार्केट
* शेती फायद्यात आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
* देशभरात शेतमालाच्या साठवणूकीच्या दृष्टीने उत्तम गोदांमासाठी ५००० कोटींची तरतूद
* हरियाणा आणि तेलंगणात फलोद्यान विद्यापीठासाठी २०० कोटी रूपयांची तरतूद
* शेतजमीन आरोग्य योजनेची घोषणा, यासाठी १०० कोटी रूपयांची तरतूद
* कृषिपंपांना सौर उर्जेसाठी ५०० कोटींची तरतूद
* भुमीहीन शेतकर्‍यांसाठी ५ लाखांपर्यंत कर्ज मिळणार