समभागांची खुली आणि सार्वजनिक विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये त्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक वाटेकरी केले जावे असा नियमातील बदल भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने शुक्रवारी केला. अशा भागविक्री प्रक्रियेत कर्मचाऱ्यांना आजवर कमाल २ लाख रुपये मूल्यांपर्यंत समभाग खरेदी शक्य होती, ती आता कमाल ५ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सेबी’च्या आयसीडीआर नियमांन्वये, भागविक्री प्रक्रियेत कर्मचाऱ्यांच्या हिश्शात वाढ केली जाणार असली तरी भागविक्री पश्चात कंपनीच्या एकूण भागभांडवलात कर्मचाऱ्यांचा वाटा ५ टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, याची काळजी कंपन्यांना घ्यावी लागणार आहे. शुक्रवारी येथे झालेल्या सेबीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या आणि अन्य महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तथापि २ लाख रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या समभागांची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्याचा अर्ज हा त्या भागविक्रीतील कर्मचाऱ्यांसाठी राखीव हिश्शाचा भरणा पूर्ण झाला नसेल, तरच विचारात घेतला जावा, अशा पोटनियमाचे कलमही जोडण्यात आले आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sebi board decision public company
First published on: 24-09-2016 at 04:31 IST