Chanakya Niti for husband-wife relationship : आचार्य चाणक्य हे उत्तम विद्वानांपैकी एक होते. त्यांनी प्रत्येक नातेसंबंधाचा सखोल अभ्यास केला आहे, ज्याचा माणसावर सर्वाधिक परिणाम होतो. यातील एक म्हणजे पती-पत्नीचे नाते. आचार्य चाणक्य मानतात की सुखी वैवाहिक जीवन असलेल्या व्यक्तीला नेहमी यश मिळतं. त्यामुळे जर तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुमचे वैवाहिक जीवन सुखी करण्याचा प्रयत्न करावा.

पती आणि पत्नी दरम्यान सुसंवाद
चाणक्य नीतिनुसार, ज्या व्यक्तीचे वैवाहिक जीवन तणाव, दुःख आणि अडचणींनी भरलेले असते, तो कितीही प्रतिभावान किंवा प्रभावशाली असला तरीही, त्याच्या जीवनात नेहमीच निराशा आणि दुःख येतं. सुखी वैवाहिक जीवनासाठी पती-पत्नीमध्ये सामंजस्य आवश्यक असतं.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
religious reform in india social transformation in religion hindu religious reform
पातक, प्रायश्चित्त आणि शुद्धीविचार
Kark Rashi mata lakshmi
कर्क राशीमध्ये निर्माण होईल डबल लक्ष्मी राजयोग! ‘या’ ३ राशीचे भाग्य उजळणार, माता लक्ष्मीच्या कृपेने प्रत्येक काम मिळणार अपार यश
actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
Suicide girlfriend Nagpur, crime case against boyfriend,
नागपूर : प्रेयसीची आत्महत्या, प्रियकराविरुद्ध गुन्हा
Amit Shah in BJP Shirdi Convention news in marathi
अग्रलेख : दबंग… दयावान?
tarkteerth lakshmanshastri joshi expressed views on marriage age of girls
तर्कतीर्थ विचार : कन्या विवाह वय विचार

आणखी वाचा : Chanakya Niti: बँक बॅलन्स, सुख-शांती सर्व काही नष्ट करतात ‘या’ ३ चुका, अपयशी बनवतात!

नात्यात विश्वास असायला हवा
आचार्य चाणक्य यांच्या मते सुखी वैवाहिक जीवन हे भेटवस्तूसारखे असते. वैवाहिक जीवन जितके आनंदी असेल तितका त्रास कमी होईल. विश्वासामुळे पती-पत्नीचे नाते घट्ट होते. दोघांनीही एकमेकांच्या भावनांचा पूर्ण आदर केला पाहिजे.

आणखी वाचा : कन्या राशीत लागोपाठ ३ ग्रहांचे राशी परिवर्तन; ‘या’ राशींचे व्यक्ती भाग्यवान ठरतील

प्रेमात पडू देऊ नका
चाणक्य नीतिनुसार प्रेम ही कोणत्याही नात्याची पहिली अट असते. पती-पत्नीचे नाते हे सर्वात पवित्र नाते मानले जाते. या नात्यात खोटेपणा आणि दिखावाला थारा नाही. त्यामुळे ते टाळावे. या नात्यात जेवढी प्रामाणिकता असेल तेवढे पती-पत्नीचे नाते अधिक घट्ट होईल.

(टीप: इथे दिलेली सर्व माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader