People to Avoid According to Chanakya: आचार्य चाणक्य यांची गणना भारतातील सर्वोत्तम विद्वानांमध्ये केली जाते. महान अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतिकार आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्राची रचना केली आहे, ज्यामध्ये त्यांनी संपत्ती, मालमत्ता, महिला, मित्र, करिअर आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचे सखोल वर्णन केले आहे. मैत्री, व्यक्तीचे आचरण यासह अनेक पैलूंचा यात उल्लेख करण्यात आला आहे. असं मानलं जातं की, आचार्य चाणक्य यांची नीति वापरली की अपयश तुमच्या जवळ सुद्धा येत नाही.
आजच्या काळातही आचार्य चाणक्य यांचे सल्ले अत्यंत अचूक ठरतात. बर्याच प्रकरणांमध्ये त्यांचे शब्द आजही अचूक सिद्ध झाले आहेत. आचार्य चाणाक्य यांच्या मते, आयुष्यात कधीही तीन प्रकारच्या लोकांची मदत करू नये. कारण यामुळे तुमच्या आयुष्यात मान-सन्मानाला हानी पोहोचतेच, पण तुम्ही एका मोठ्या संकटात देखील सापडू शकता. कोणते आहेत, हे तीन लोक जाणून घेऊयात…
चाणक्य नीती: ‘या’ ३ प्रकारच्या लोकांना मदत केली, तर वाट्याला येतो अपयश!
मूर्खाशिष्योपदेशेन दुष्टास्त्रीभरणेन च,
दु:खिते सम्प्रयोगेण पंडितोऽप्यवसीदति।
मूर्ख माणूस: या श्लोकाद्वारे आचार्य चाणक्य जी म्हणतात की, मूर्खांपासून नेहमी अंतर ठेवावं. कारण अशा लोकांना ज्ञान देणं म्हणजे गाढवासमोर गीता वाचल्यासारखं आहे. तुम्ही मूर्ख व्यक्तीच्या भल्याचा विचार केला तरी तो मूर्खपणाचे तर्क देईल. मूर्ख व्यक्तीला ज्ञान देणं हा वेळ आणि शक्तीचा अपव्यय मानला जातो. त्यामुळे अशा लोकांशी तर्क करत बसणं व्यर्थ ठरतं. त्यांच्याशी नातं ठेवणंही तुमच्या मानहानीस कारणीभूत ठरू शकतं.
वाईट स्वभावाची व्यक्ती: आचार्य चाणक्य लोकांना वाईट स्वभाव असलेल्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही चारित्र्यहीन व्यक्तीसोबत वेळ घालवला तर तुमची प्रतिमाही डगमगू शकते. ज्यांचा वागणुकीचा दर्जा खालावलेला असतो. अशा व्यक्तींसोबत नातं ठेवणं किंवा त्यांना मदत करणं हे स्वतःच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण करणारं असतं. म्हणूनच चाणक्य जी नेहमी वाईट स्वभावाच्या व्यक्तीपासून अंतर ठेवण्याचा सल्ला देतात.
विना कारण दु:खी राहत असलेली व्यक्ती: आचार्य चाणक्यजींचा असा विश्वास आहे की, जो माणूस विनाकारण सतत दुःखी असतो, तो नेहमी इतरांच्या प्रगतीचा हेवा करत असतो. अशा लोकांमध्ये ईर्ष्याची भावना असते. तो प्रत्येकाला मागे ढकलण्याचा प्रयत्न करतो. म्हणून, चाणक्य जी सल्ला देतात की विनाकारण सतत दुखी असलेल्या व्यक्तीपासून नेहमी अंतर ठेवा. चाणक्य जी म्हणतात की, अशा लोकांना नेहमी इतरांचा फायदा कसा घ्यायचा हे माहित असतं आणि ते काम पूर्ण झाल्यावर तुम्हाला सोडून जातात.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.)