समाजासमोर आज आदर्शच शिल्लक नाहीत अशी व्यक्त होणारी खंत आपण नेहमीच अनुभवतो. मात्र थोडे डोळे उघडून पाहिले तर आदर्श शोधण्यासाठी आपल्याला फारशी धडपड करावी लागत नाही. तर आपली दृष्टी बदलावी लागते, हे औरंगाबाद जिल्हय़ातील औरंगाबाद तालुक्यातील बकापूर-श्यामवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीने कृतीतून दाखवून दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद शहरापासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावरील या गावात २००७ साली एकही शौचालय नव्हते. तत्कालीन सरपंच सुदाम पळसकर व गावकऱ्यांनी एकाच वर्षांत गावात १४५ घरांपकी सर्व घरात शौचालय बांधून निर्मलग्राम पुरस्कार मिळविला. दुसरे वर्षी गावकऱ्यांनी थोडासा कंटाळा केला. आजूबाजूचे ग्रामस्थ स्थलांतरित होऊन गावात राहायला आले. त्यातून गावची कुटुंबसंख्या २३६ वर पोहोचली व लोकसंख्या १६३५ वर गेली. पुन्हा २०१५ मध्ये गावकऱ्यांनी स्वच्छ भारत अभियानात सहभाग देण्यासाठी प्रयत्न केले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bakapur shamwadi gram panchayat new record
First published on: 31-07-2016 at 01:52 IST