औरंगाबाद व जालना जिल्हय़ांतून जाणाऱ्या संकल्पित समृद्धी मार्गावर सध्या आंबा लावण्याचा सपाटा गावोगावी सुरू झाला आहे. सरकारने जमीन घेतलीच तर झाडांचे अधिकचे पैसे मिळावे, यासाठी शेतकरी आमराई लावत आहेत. औरंगाबाद शहराच्या हद्दीबाहेर आंब्याची रोपे विकणारे आंध्र प्रदेशातील अनेक रोपविक्रेते दाखल झाले आहेत. मराठवाडय़ात गेल्या काही वर्षांत आंबा लागवड वाढली आहे. सध्या हे प्रमाण १९ हजार हेक्टपर्यंत आहे. समृद्धी मार्गात ज्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांनी रोपलागवड सुरू केली आहे. २ वर्षांपासून ते अगदी फळधारणा लगेच होईल, असे रोपही मिळत असल्याने झाडांमधील गुंतवणूक वाढत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद व जालना जिल्हय़ांतून समृद्धीचा मोठा भाग जात आहे. वडखा, वरुडकाझी, जयपूर या गावांसह औरंगाबाद व जालना जिल्हय़ांत आमराई उभारण्याची प्रक्रिया सध्या जोरदारपणे सुरू आहे. शासकीय रोपवाटिकांमधून केवळ एक किंवा २ वर्षांपर्यंतची रोपे ५० रुपयाला एक याप्रमाणे मिळतात. या रोपांना जारवा अधिक असतो. म्हणजे रोपांना मुळांची संख्या अधिक असते. त्यामुळे रोपे मरण्याचे प्रमाण तसे कमी असते. मात्र, मोठय़ा स्वरूपातील रोपे मिळत असल्याने एक हजार रुपयांना एक मोठे रोप आणून ते समृद्धीच्या संकल्पित रस्त्यावर लावले जात आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mango farming at mumbai nagpur samruddhi expressway
First published on: 21-04-2017 at 01:25 IST