मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यावर तात्काळ पालिकेतील तीन अधिकाऱ्यांची बदली झाल्यामुळे आता पालिकेतील अधिकारी धास्तावले आहेत. पालिकेतील सहाय्यक आयुक्तांपासून ते अतिरिक्त आयुक्तांपर्यंत सगळय़ांमध्येच बदलीच्या भीतीचे वातावरण आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात सत्तांतर होताच सोमवारी पालिकेतील तीन सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निकटचे मानले जाणारे किरण दीघावकर यांची दादर, धारावीतून भायखळय़ामध्ये बदली करण्यात आली. यामागे राजकीय नेत्याचा हात असल्याची चर्चा आहे. या बदल्यांनंतर आता अन्य काही सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांचीही चर्चा पालिकेत आहे. लवकरच आणखी काही सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या होतील अशी अटकळ बांधली जात आहे . मुंबईतील बंडखोर आमदारांचे काही पालिका अधिकाऱ्यांशी पटत नव्हते. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी आमदारांनी तगादा लावला होता, असे समजते. आता सत्तांतर झाल्यामुळे असे सर्व अधिकारी सध्या चिंतेत आहे.

मराठीतील सर्व मुंबई महापालिका निवडणूक २०२२ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fear atmosphere over transfer in bmc officers zws
First published on: 06-07-2022 at 05:31 IST