जुना उत्तर मुंबई मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मनाला जात होता. मात्र अभिनेता गोविंदा त्यांच्या माध्यमातून या मतदारसंघात काँग्रेसने पाय रोवले. या मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतरसुद्धा संजय निरुपम यांनी निवडून येत उत्तर मुंबईत कॉंग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला. निरुपम यांनी उत्तर मुंबईत पक्षाची मजबूत रचना करण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे या मतदार संघात गुजराती मतदार मोठ्या प्रमाणत आहेत त्याचप्रमाणे मालाड आणि मालवणी या पट्ट्यात उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहे. मालवणी विधानसभेचे आमदार अस्लम शेख यांनी याभागात काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवले आहे.

२०१४ च्या मोदी लाटेत या मतदार संघात काँग्रेसचा धुरळा उडाला. याचा परिणाम येथील महानगर पालिकेच्या मतदार संघावरसुद्धा झाला. बोरिवली, कांदिवली या भागात काँग्रेसचे अस्तित्व कमी झाले. सध्या मालवणीतील लोकांनीच कॉंग्रेसला हात दिला आहे. महानगर पालिका निवडणूक तोंडावर आल्या असताना देखील संजय निरूपम मतदारसंघात फारसे फिरकत नाहीत. त्यामुळे ज्या भागात काँग्रेसचे अस्तित्व होते त्या भागातसुद्धा काँग्रेसची ताकद कमी होऊ लागली आहे. पक्षाला याचा फटका येणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. महानगरपालिका निवडणुकीत भाजपाच्या वाढत्या वर्चस्वाला आव्हान देणाची ताकद शिवसेनेत होती. मात्र बंडखोरीमुळे शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आणि भाजपाचा मार्ग मोकळा झाला.

nana patole vishal patil (1)
“विशाल पाटलांना कोणीतरी फूस लावतंय”, नाना पटोलेंचा रोख कोणाकडे?
lok sabha election in madhya pradesh crisis in madhya pradesh congress
घाऊक पक्षांतर मध्य प्रदेशात काँग्रेससाठी चिंतेचे
pune ravindra dhangekar marathi news, ravindra dhangekar congress latest news in marathi
पुण्यात काँग्रेसला स्वकियांचाच धोका, केंद्रीय पथक दाखल
Why did Congress state president Nana Patole reject the candidacy of MP
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदारकीची उमेदवारी का नाकारली?