सरकारने अर्थसंकल्पात ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. या वर्षी शेतीचे उत्पन्न ४ टक्क्याने वाढणार आहे व सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे उत्पन्न आगामी पाच वर्षांत दुप्पट करण्याचे सरकारने योजले आहे. यासाठी जलसंपदेसाठी सरकारने तरतूद केली आहे. या व्यतिरिक्त देशभरात पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी मोठी तरतूद केली आहे ही तरतूद रस्ते पंतप्रधान ग्रामसडक योजना व महामार्ग विकसित करण्यासाठी वापरण्यात येईल. केवळ रस्तेच नव्हे तर जलमार्ग व विमानतळासाठीदेखील वाढीव तरतूद सरकारने या अर्थसंकल्पात केली आहे. रेल्वेच्या भांडवली खर्चासाठी १ लाख २५ हजार कोटींची तरतूद केली आहे. ही तरतूद मुख्यत्वे ग्रामीण भारताची क्रयशक्ती वाढविण्यास मदत करेल. ग्रामीण भारताची क्रयशक्ती वाढली की आपोआप देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या सरकारच्या वैयक्तिक कररचनेत बदल केल्यामुळे सामान्य करदात्याला सरकारने दिलासा दिला आहे. वैयक्तिक आयकर दरात कपात केल्यामुळे करदात्यांच्या हातात खर्च करण्यासाठी अधिक रक्कम राहील. ५० कोटीपर्यंत उलाढाल असलेल्या कंपन्यांच्या कराच्या दरात कपात केल्यामुळे करपश्चात नफ्यात वाढ होणार आहे. या दोन्हींचा फायदा बांधकाम उद्योगाला होणार आहे. निश्चलनीकरणाचा सर्वाधिक फटका बांधकाम उद्योगाला बसला होता. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हातात पैसा उरतो तेव्हा गुंतवणुकीसाठी तो पहिली प्राथमिकता देतो.

मराठीतील सर्व अर्थसंकल्प २०१७ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union budget 20 arun jaitley
First published on: 02-02-2017 at 01:21 IST