मोदी सरकारने आर्थिक वर्ष २०२२ चा अर्थसंकल्प सादर केला. यात अनेक घोषणा करण्यात आल्या. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना या अर्थसंकल्पानंतर त्यांच्या खिशावरील आर्थिक ताण किती कमी होणार आणि किती वाढणार हाच प्रश्न आहे. त्यामुळेच केंद्रीय अर्थसंकल्पानंतर देशात कोणत्या वस्तू स्वस्त होणार आणि कोणत्या वस्तू महाग होणार याचाच हा आढावा. काय महाग होणार? केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना कस्टम ड्युटी वाढवण्याचं सुतोवाच केलं. त्यामुळे आता बाहेर देशातून आयात होणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढणार आहेत. यात खालील गोष्टींचा समावेश आहे. १. छत्री२. हेडफोन३. इअरफोन४. लाऊडस्पिकर५. स्मार्ट मीटर६. सोलर सेल७. सोलर मॉड्युल८. एक्स रे मशिन९. इलेक्ट्रिक खेळण्याचे भाग काय स्वस्त होणार? १. कापड२. चमड्याच्या वस्तू३. मोबाइल४. फोन चार्जर५. चप्पल६. हिऱ्यांचे दागिने७. शेतीची साधनं८. गोठलेले शिंपले९. हिंग१०. कोको बिन्स११. मिथाइल अल्कोहोल१२. व्हिनिगरचे आम्ल (Acetic Acid)१३. पेट्रोलियम उत्पादनांसाठी आवश्यक केमिकल१४. मोबाईल फोनच्या कॅमेरा लेन्स१५. स्टिल स्क्रॅब हेही वाचा : “अर्थसंकल्पात सामान्य जनता, शेतकऱ्यांना भोपळा मात्र ‘मित्रों’साठी…”, नाना पटोलेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा कोणत्या? कॉर्पोरेट टॅक्स १८ टक्क्यांवरुन १५ टक्क्यांवरत्यावर लागणारा सरचार्जही कमी करण्यात आला असून १२ टक्क्यांवरुन ७ टक्क्यांवर आणलाकॉर्पोरेट टॅक्सची मर्यादा १० कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहेइन्कम टॅक्स रिटर्नमध्ये चूक झाल्यास सुधारण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी मिळेलपेंशमध्ये करावर सवलत -क्रिप्टो करन्सीवर होणाऱ्या कमाईवर ३० टक्के कर