मुंबई: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसची (टीसीएस) १७,००० कोटींची समभाग पुनर्खरेदी (शेअर बायबॅक) येत्या १ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. गुंतवणूकदारांना ७ डिसेंबरपर्यंत समभाग पुनर्खरेदी योजनेत सहभागी होता येईल.

कंपनीने प्रत्येकी १ रुपया दर्शनी किंमत असलेल्या ४.०९ कोटी समभागांच्या म्हणजेच सुमारे १७,००० कोटी रुपयांपर्यंत समभाग पुनर्खरेदीचा प्रस्ताव दिला आहे. प्रत्येकी ४,१५० रुपये किमतीला प्रस्तावित समभाग पुनर्खरेदी केली जाणार आहे. टीसीएस पुनर्खरेदीची ३,४७० रुपये या मंगळवारच्या बंद भावाच्या तुलनेत भागधारकांना २० टक्क्य़ांचे अधिमूल्य मिळवून देणारी आहे. किरकोळ गुंतवणूकदारांकडे असलेल्या प्रत्येक सहा समभागांमागे कंपनीकडून एका समभागाची पुनर्खरेदी केली जाणार आहे.

65 year old Chartered Accountant 2 5 Crore Cyber ​​Fraud Mumbai
पासष्ट वर्षीय सनदी लेखापालाची अडीच कोटीची सायबर फसवणूक; गुंतवणूकीच्या नावाखाली बनावट मोबाइल ॲपद्वारे फसवणूक
Meet indian ice cream lady rajni bector woman who witnessed partition left Pakistan for India spent 7 days under trees now owns Rs 8000 crore
देशाच्या फाळणीनंतर झाडाखाली घेतला आसरा, मालगाडीने भारतात आल्यानंतर आज ८ हजार कोटींच्या मालकीण; कोण आहेत रजनी बेक्टर?
sleep company target to reach the revenue mark of rs 1000 crores in 3 years
तीन वर्षांत १,००० कोटींच्या महसुली टप्पा गाठण्याचा ‘द स्लीप कंपनी’चे लक्ष्य
Record volume of supplemental demands Demands of around one lakh crores for various schemes print politics news
पुरवणी मागण्यांचे आकारमान विक्रमी? विविध योजनांसाठी सुमारे एक लाख कोटींच्या मागण्या
Increase in windfall tax on domestically produced mineral oil
देशांतर्गत उत्पादित खनिज तेलावरील विंडफॉल करात वाढ; टनामागे ३,२५० रुपयांवरून आता ६,००० रुपयांचा कर
union minister nitin gadkari in favor of smart meters
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्मार्ट मीटरच्या बाजूने.. विरोध करणारी समिती म्हणते…
Medha Patkar Indefinite Hunger Strike,
अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत! बॅकवॉटर लेव्हल्सचा मुद्दा काय आहे?
gross liabilities of government increased to rs 171 78 lakh crore at the end of march 2024
सरकारचे दायित्व १७१ लाख कोटींवर; मार्चअखेरीस संपलेल्या तिमाहीत ३.४ टक्क्यांची वाढ

सहा वर्षात पाचव्यांदा ‘बायबॅक’

गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत ‘टीसीएस’ने आणलेली ही पाचवी समभाग पुनर्खरेदी योजना आहे. कंपनीने आतापर्यंत चार समभाग पुनर्खरेदी योजनेच्या माध्यमातून भागधारकांकडून ६६,००० कोटी रुपये मूल्याचे समभाग खरेदी केले आहेत. मंगळवारच्या सत्रात टीसीएसचा समभाग १३.०५ रुपयांच्या वाढीसह ३,४७०.१५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या समभागांच्या बाजारभावानुसार कंपनीचे १२.६९ लाख कोटींचे बाजारभांडवल आहे.

‘बायबॅक’ योजनेचा लाभार्थी टाटा समूहच!

(टीसीएस) आखलेल्या समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेतून सर्वाधिक लाभ तिची सर्वात मोठी भागधारक असलेल्या टाटा सन्सला होणार आहे. या बायबॅक योजनेत टाटा सन्स सहभागी होणार असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. टाटा समूहातील सर्व कंपन्यांची धुरा सांभाळणाऱ्या टाटा सन्सचा समभाग पुनर्खरेदी योजनेअंतर्गत २.९६ कोटी समभाग विकण्याचा मानस आहे, तर टाटा समूहातील दुसरी कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनकडे टीसीएसच्या १०,१२,६३० समभागांची मालकी आहे, त्यापैकी ११,३५८ समभागांची विक्री ही कंपनी करू इच्छिते. यातून या दोन्ही कंपन्यांना एकत्रित १२,२८४ कोटी रुपयांचा लाभ होणे अपेक्षित आहे.

समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणजे काय?

एखादी कंपनी तिच्या विद्यमान भागधारकांकडून एका निर्धारित किमतीला कंपनीचे समभाग खरेदी करते यालाच समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणतात. कंपनीकडून बाजारभावापेक्षा अधिक किमतीने गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदी केले जातात. प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) अगदी विरुद्ध अशी ही प्रक्रिया आहे.