सुश्रुत रवीश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजच्या लेखात आपण भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence) या विषयाबद्दल चर्चा करणार आहोत. यूपीएससीने दिलेल्या मुख्य परीक्षेतील चौथ्या पेपरमधील हा एक महत्त्वाचा घटक आहे. आपण अनेकदा सभोवताली अशा व्यक्ती बघतो ज्या अतिशय ‘बुद्धिमान’ व ‘हुशार’ असतात, मात्र आयुष्यातील साधी आव्हाने स्वीकारणे त्यांना अतिशय अवघड जाते. अनेकदा ‘बुद्धिमत्ता’ परीक्षेमध्ये गुण मिळवून देऊ शकत नाही अथवा कामाच्या ठिकाणी पुरेशी ‘बुद्धिमत्ता’ असूनही फारशी प्रगती साधता येत नाही. या आणि अशा अनेक वेगवेगळ्या घटनांमधून आपणास हे पाहता येते की, ‘बुद्धिमान’ व्यक्ती ही ‘यशस्वी’ व्यक्ती असतेच असे नाही. किंबहुना त्यांच्या अपयशाचे गमक हे त्यांच्या बुद्धिमत्तेच्या असण्याशी किंवा नसण्याशी जोडलेले नसून वेगळ्याच घटकांशी संबंधित असते. हा घटक म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता असल्याचे अनेकांच्या लक्षात आले आहे. मात्र इथे एक गोष्ट विशेष लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे- व्यक्तीने भावनिक असणे आणि भावनिकदृष्टय़ा बुद्धिमान असणे या दोन संपूर्ण भिन्न गोष्टी आहेत. अनेकदा हा फरक बारकाईने लक्षात घेतला जात नाही. भावनिक बुद्धिप्रामाण्यच्या अभ्यासाचे मूळ आपल्याला डार्वनिच्या सद्धांतिक कामामध्ये आढळून येते. डार्वनिने हे सर्वात प्रथम मांडले की, भावनिकरीत्या व्यक्त होता येणे हे तग धरून ठेवण्यासाठी (Survival) आवश्यक असते.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc exam preparation upsc exam guidance upsc exam
First published on: 31-01-2019 at 02:29 IST