युनिसेफच्या नुसार ५५,००० पेक्षा जास्त गर्भवती महिला प्रसूतीच्यावेळी मृत्यू पावतात. याला वेळोवेळी मेडिकल चिकित्सा करून हे थांबवले जाऊ शकते. या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. उपलब्ध सार्वजनिक आरोग्य सेवा ग्रामीण भागात : प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायिक स्वास्थ्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उप-जिल्हा रुग्णालये, जिल्हा रुग्णालये मेडिकल कॉलेज रुग्णालये शहरी भागात : शहरी रुग्णालये, शहरी आरोग्य केंद्र, प्रसूतीगृहे अभियानाचा उद्देश गर्भवती महिलांसाठी चांगले आरोग्य आणि स्वतंत्र तपासणी प्रदान करणे मातृत्व मृत्यू दर कमी केला जाईल गर्भवती महिलांना त्यांच्या आरोग्याच्या समस्या आणि परिस्थितीबाबत जागरूक करणे मुलांचे निरोगी जीवन आणि सुरक्षित प्रसूतीची खात्री करणे प्रमुख वैशिष्टय़े ही योजना फक्त गर्भवती महिलांना लागू राहील. प्रत्येक महिन्याच्या ९ तारखेला मोफत आरोग्य तपासणी होईल या योजनेनुसार सर्व प्रकारची वैद्यकीय तपासणी पूर्णपणे मोफत आहे. तपासण्या वैद्यकीय केंद्रे, सरकारी आणि खासगी रुग्णालयात आणि देशातील खासगी दवाखान्यात केल्या जातील महिलांना त्यांच्या आरोग्य समस्यांच्या आधारावर वेगळे चिन्हांकित केले जाईल ज्यामुळे डॉक्टरांना सहजपणे समस्या ओळखू शकतील. भारत सरकारने या योजनेंतर्गत गर्भवती महिलांना सर्व प्रकारचे वैद्यकीय साहाय्य मोफत करण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेसाठी पात्रता गर्भावस्थाच्या ३ ते ६ महिन्यात महिला या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाचा लाभ घेण्यास पात्र राहील.