अनेकदा आपल्या माणसाची जवळ असताना किंमत कळत नाही, पण दूर गेल्यावर मात्र चन पडत नाही. बरोबर जगताना प्रेम करायचं, समजून घ्यायचं, चुकलं तर माफ करायचं असतं. त्याऐवजी आपलाच अहं कुरवाळत बसतात सगळे. नंतर स्वत:चा रागराग करीत जगतात. येणारा जाणारच कधीतरी. भेटलेला दुरावणारच. आपलं वागणं तर असतं ना आपापल्या हातात. गेलेले-दुरावलेले मनात असतात ठाण मांडून. त्यांनाच विचारायचं, ‘कशी राहू,तू नसताना मी?’
अगदी परवाचीच गोष्ट. पाहुणे घरी आलेले. मस्त गप्पा रंगल्या. मधेच एकेकजण झोपायला गेला. शेवटी मी उठून आतल्या रूममध्ये बघते तो काय, सगळे गाढ झोपलेले. मलाही खूप झोप आलेली, पण माझी उशी कुणीतरी घेतलेली. सहज बोलून गेले, ‘‘अगं उशी गं उशी, तू नसताना मी झोपू तरी कशी?’’
जसं उशीचं तसं अनेक गोष्टींचं. सवयीचे गुलाम आपण, दुसरं काय. हातात मोबाइल नसेल तर अस्वस्थ होतोच. गाडी एखादे दिवशी सíव्हसिंगला दिली की लगेच, गाडी नसताना मी जाऊ तरी कशी? इतर वाहने, रिक्षा, बस, लोकल आहे ना, आणि नसेल सोयीस्कर तर दोन पाय आहेतच की शाबूत. पण छे, पडणार नाही बाहेर. घरात, लाइट नाही म्हणजे टीव्ही, इंटरनेट, लॅपटॉप नाही. करमणार कसं?
खरं तर माणूस येताना एकटा येतो, आल्यावर गोतावळा गोळा करीत फापटपसाऱ्यात जगतो. प्रत्येकात कणकण जीव अडकतो म्हणूनच उठता बसता म्हणत राहतो. ‘पेपर नाही टाकला, उठल्या उठल्या चुकल्यासारखं झालं.’ ‘ गॅस नाही, स्वयंपाक कसा करू?’ ‘दूधच नासलं आज, चहा कसा मिळणार?’ ‘अरे,अरे, मिठा, तू नसताना मी भाजी कशी गिळू?’ आहे ना गंमत. अडकावं कशाला इतक्या सर्वत्र? थोडं खुट्ट झालं की बिनसलंच आपलं.
अशी या निर्जीव वस्तूंमध्ये अडकणारी आपण माणसे, आपापसात गुंतलो नाही तरच नवल. बाळाला पहिल्या श्वासालाच भेटतात सगळी नाती. वाढत्या वयाबरोबर नातीही फुलतात.
आई करते, ‘बाबू, कू. क!’’ तोंडावर धरलेला आपलाच हात. बाळाचा चेहरा कावराबावरा. जणू म्हणतं, ‘‘आई गं, तू नसताना मी.. काय करणार’’ किती अल्पावधीसाठी हात धरला चेहऱ्यावर. इथे लहानग्याला आई नसतानाची भावना रडायला लावते. असं का होतं? कुठेतरी गुंतलेला धागा अडकतो, तुटेल अशी भीती वाटते, रडू कोसळतं. बाळाचंच कशाला. घरातला एक जरी जण काही दिवसांसाठीसुद्धा बाहेरगावी गेला तरी आपण अस्वस्थ होतोच. ‘तू नसताना मी’ अशी अवस्था होऊन जाते.
खरं पाहता, कोणाचंच कोणावाचून काहीही अडत नाही. थोडा वेळ, काही दिवस अनुपस्थिती जाणवते. हळूहळू आपोआप सगळं सुरळीत होतेही. परंतु, त्या मधल्या काळातील मनाची अस्वस्थता भयानक होते. वास्तव स्वीकारले जात नाही. आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण वाया घालवले जातात इतकंच. काळ हेच सर्वावर औषधं असल्याने, कालांतराने पडदा पडतो. थोडय़ा दिवसांसाठी किंवा कायमस्वरूपी गेलेल्या व्यक्तीचे स्थान मनातल्या मनात अबाधित राहू शकते. फक्त जागा बदलते. आधी वावर होता, सहवास होता, आता फक्त मनातल्या कोपऱ्यात निवास उरला, असं मनाला समजावलं तर म्हणता येते, ‘‘तू नसल्याची भावना मला बोथट करता येत नाही, फक्त त्या भावनांबरोबर िहदोळायचं नाही असं ठरवलं मी आणि पूर्वीसारखे वागू लागले.’’
अगदी चांगला आहे हा विचार. नसलेल्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावायचं नसतं. भूतकाळातील आठवणींमुळे वर्तमानातला क्षण सोडायचा नसतो. आपल्यालाही मोजकेच श्वास दिलेले आहेत, याचं भान ठेवून समोरचा क्षण जिवंतपणे स्वीकारला की धीर वाढतो, क्लेश जाणवत नाहीत. अशीच व्यक्ती म्हणू शकते, ‘‘तू असताना मी एक झंझावाती वादळ होते, तू नसतानाही तशीच आहे. जेव्हा केव्हा वादळ शमतं तेव्हा थकूनभागून तुझ्याजवळ विसाव्याला येते इतकंच.’’
तर काहींच्या बाबतीत भयानक घडतं. तू नसताना मी जगूच शकत नाही, असं म्हणत प्रेयसीलाही जगू द्यायचं नाही हा भावनेपोटी होतो तिचा खून, त्याही पलीकडे कधी कधी आत्महत्या. का होतं असं? अवास्तव अपेक्षा, स्वत:बद्दलचा अतिआत्मविश्वास, बेफिकीर वृत्ती ताब्यात ठेवणं जमतंच नाही म्हणून? हवं ते मिळवण्यासाठी हट्टी मन मग वाट्टेल त्या मार्गाने धडपड करतं आणि शेवटी जे घडतं ते अमानुष असतं.
हे झालं सामान्यांच्या आयुष्यातलं. काही वेळा नामवंताचं नसणंसुद्धा सार्वजनिक होऊ शकतं. हेच पाहा ना. आपल्या सचिनने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि तमाम भारतीयांना क्रिकेटची काळजी पडली. शेजारच्या नंदूने तर सचिनला ई-मेल केला, ‘‘तू नसताना मी मॅच बघू शकणार नाही. मला ती शिक्षा वाटेल.’’
तर काही वेळा ‘तू नसताना मी’ खूप काही वेगळं मिळवूनही देतो. नकारातून सकारात्मक. रेखा, हुशार आणि करिअरिस्ट. तिला अधूनमधून जावं लागायचं बाहेर परगावी किंवा परदेशातसुद्धा. जाताना तिच्या आपल्या सूचनांवर सूचना. हे नेहमीचंच झालं. तेव्हा शशांक, तिचा नवरा तिला म्हणाला, ‘‘तू नसताना माझं मुलांशी मस्त ए वन मेतकूट जमलं. आणि आता तर आमचं छान जुळतं. मोकळेपणा आलाय आमच्या नात्यात. तू नसताना मी छान मॅनेज केलं घर. करतोय, अर्थात तुझी आठवण पदोपदी येतेच. आमच्या गप्पांतही तू असतेसच. पण तुला सांगतो, गरज असेल तेव्हा तू जात जा. तुलाही तुझं करिअर आहेच की. तुझी वाट बघत आहोत सगळे.’’ स्त्रियांना इतकी मोकळीक देऊन करिअर करताना साथ देणारे थोडेच आहेत.
 एखाद्याच्या आयुष्यात ‘तू नसताना’ आनंदाचं ठरतं. आमची कामवाली खूप कष्ट करायची. वर नवऱ्याचा मारही खायची. तो अचानक गेला आणि ती सुटली. त्याला उद्देशून सखुबाई बोलत होती परवा, ‘‘गुरावाणी बडवायचास मला, लाथा-बुक्क्यांनी. मी आणि पोरं नुसती रडायचो. तुला यायचा चेव. का रडता म्हणत लाथा घालायचास कंबरेत. मुडद्या मेल्या, नरकातच गेला असशील आता, तू नसताना मी मजेत आहे. मी, माझी मुलं, माझं घर सारे सुखात आहोत. आनंदोत्सव साजरा करतो आम्ही.’’ कुणाचं जाणं एखाद्याला इतकं आनंदी करत असेल तर त्या माणसाचं जगणं व्यर्थ आहे.
अशी ही नाती आणि त्यांचे घट्ट जाळे. नात्यानात्याचे धागे भक्कम असतात, म्हणून तर सगळं कसं सुरळीत होतं आयुष्यात. एखादा धागा सल पडला, तुटला, निसटला तर जाळ्याची वीण कमकुवत होते, कुरकुरू लागते. टांगणीला लागतो जीव. सगळेच अनुभवतात हे असलं जिणं. हा नियम सगळ्यांना सारखाच. प्रसंगात बदल आणि वस्तू किंवा व्यक्ती वेगवेगळी. तो, ती, आणि ते नसताना मी नीट राहू शकत नाही, एव्हढेच. अनेकदा आपल्या माणसांची जवळ असताना किंमत कळत नाही, पण दूर गेल्यावर चनही पडत नाही. बरोबर जगताना प्रेम करायचं, समजून घ्यायचं, चुकलं तर माफ करायचं असतं. त्याऐवजी आपलाच अहं कुरवाळत बसतात सगळे. नंतर स्वत:चा रागराग करीत जगतात. येणारा जाणारच कधीतरी. भेटलेला दुरावणारच. आपलं वागणं तर असतं ना आपापल्या हातात. गेलेले-दुरावलेले मनात असतात ठाण मांडून. त्यांनाच विचारायचं, ‘कशी राहू तू नसताना मी?’
अवघड असतं आपल्या माणसाला सोडून राहणं. आपलं म्हटलं की नातं कुठलंही असो. तरीही पतीपत्नीच्या नात्यात मागे उरलेल्यांची हालत फार वाईट होते. कोण पुढे जाणार यात शर्यत लागते. माझ्याविना तू कसा राहशील, तुझे कोण काय बघेल, ही विवंचना छळते आतल्या आत. कशी सांगावी ती कुतरओढ? माझ्याच एका कवितेसारखी तर असते ती. बघा जरा, पटते का?    
 
संसाराचा किती र्वष खेळला त्यांनी सारीपाट
तरीपण दोघांना जाता येत नाही पाठोपाठ
‘‘ तू थांब मागं, मला जावं लागेल पुढं’’
दोघेजण दामटत होते आपलं आपलं घोडं.        

देवाच्या हिशोबी दोघांचेही हिशोबच वेगळे
बेरीज, वजाबाकी, गुणाकार करून उरलेल्याला भागलं
ज्याचं गणित बरोबर त्याला अलगद उचललं
खूप विचार केला, वाटलं सारं काही संपलं.

summer vacation at home
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं घर
Loksatta editorial about 33 loss making firm donated electoral bonds to various parties
अग्रलेख: दे दान; कोणते ‘गिऱ्हाण’?
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
Firing incident
मद्यपान सोडा, तोपर्यंत केस कापणार नाही; मुलाच्या हट्टानंतर वडिलांनी स्वतःवर झाडली गोळी

रडलं, भाकलं, ओरडलं, आरडलं नंतर मात्र स्थिरावलं
पुढे गेलेल्याला काय वाटेल? मीच मनाला दटावलं
तेव्हा कुठे माझं मला थोडं फार उमजलं
‘तू नसताना मी’ आहे, त्यातच सुख मानायचं ठरवलं.