दासबोधात गृहस्थाश्रमाचे, महत्त्व समर्थ रामदासांनी सांगितले आहे, विवाह झाल्यानंतर गृहस्थाश्रमाला सुरुवात होते, या आश्रमात गृहिणीला महत्त्व आहे, गृहिणी कशी असावी या बद्दल कालिदास म्हणतो, गृहिणी ही पतीची सचिव, तसेच त्याची सखीदेखील असली पाहिजे. ती पतीच्या ध्येयाशी एकरूप झाली पाहिजे. अलीकडच्या काळात, यासाठी साधना आमटे आपल्या डोळ्यांसमोर येतात, एक उच्चशिक्षित, सधन घरातील तरुणी, गळ्यात फक्त काळ्या मण्याची पोत घालून, सुती साडी नेसून, मुरलीधर आमटे या युवकाशी विवाह करते. त्यांच्या कार्यात समरस होताना, चुलीवर २५, ३० माणसांचा स्वयंपाक करते, विंचू-साप-इंगळ्यांना घाबरत नाही, केवळ पाच महारोगी आणि एक गाय घेऊन आनंदवनात राहते, हे सारेच विलक्षण.
गृहस्थाश्रमाचा हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदा आमटे, हेमलकसा येथे आले, जिथे घनदाट जंगल आहे, उन्हाची तिरीपदेखील नाही, या वस्तीत सधन घरातील मंदा, आपल्या पतीच्या कार्यात समरस झाली, आदिवासी स्त्रियांची बाळंतपणे करू लागली, पतीबरोबर आदिवासी वस्तीत जाऊ लागली, घरात नळ नाही, झोपायला धड जागा नाही, जेवणाचा पत्ता नाही, असे असूनदेखील अनाथ प्राण्यांनाही मायेची सावली द्यायची, हे नक्कीच सोप्पं नाही.

मराठीतील सर्व चित्ती असो द्यावे समाधान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of marriage in human life
First published on: 30-01-2016 at 01:04 IST