राजन गवस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रॅक्टर आला नि बल गोठय़ातून हद्दपार झाला, मग गल्लीतून हद्दपार होत होत गावातूनही गेला. दोन महिन्यांच्या शेतीकामासाठी बारा महिने फुकट बल पोसणे तोटय़ाचे वाटू लागले. नव्या अर्थव्यवस्थेने शेतकऱ्याला बलापासून तोडून टाकले. आणि नवंच वर्तमान समोर आलं. बहुतांशी कोरडवाहू शेतकऱ्यांना आज जगवते आहे ती त्यांच्या गोठय़ातील म्हैस. तीच घराची पोशिंदी. मुलांची शिक्षणं, लेकीचा आयारमाह्य़ार, पाहुण्यापैंचं आगतस्वागत सारंच चालत असते या म्हशीच्या जिवावर. पाऊसपाणी, शेतीभाती सगळेच बेभरवशाचे. म्हैस बनली आहे गावाचा जगण्याचा आधार.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Importance of buffalo village abn
First published on: 14-09-2019 at 00:04 IST