शरीराला रक्तपुरवठा करणारं जसं रक्तवाहिन्यांचं जाळं असतं तसं अर्थपुरवठा करणारं बँका हे जाळं आहे. स्त्रियांचा त्यात सहभाग वाढवणं म्हणजे अर्थ व्यवहारातला त्यांचा सहभाग वाढवणं आहे. आज भारतातल्या ५३ टक्के स्त्रियांची  बँकेत खाती आहेत, पण याचा नेमका अर्थ काय आणि उरलेल्या ४७ टक्के स्त्रिया आजही या परिघाबाहेर आहेत त्याची कारणे काय असावीत..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्तमानपत्रात २ मार्च रोजी एक आशादायक बातमी झळकली. त्यात म्हटल्याप्रमाणे  आता ५३ टक्के भारतीय स्त्रियांची खाती बँकेत उघडण्यात आली आहेत. या बाबतीत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करता असं लक्षात आलं की, २०१४ पर्यंत स्त्रियांच्या खात्यांची संख्या कमी होती. काही पाहाण्यांच्या निष्कर्षांप्रमाणे ही संख्या २०१४ ते २०१६ या दोन वर्षांत ४८ टक्क्यांवरून ६१ टक्क्यांवर गेली आहे; पण एक मात्र नक्की की, गेल्या २ वर्षांत स्त्रियांच्या बँक खात्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली आहे. ही निश्चितच स्वागतार्ह गोष्ट आहे. एकूणच स्त्री सक्षमीकरणासाठी आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठीही!

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 47 percent of indian women did not have bank accounts
First published on: 25-03-2017 at 02:54 IST