भारतीय मुस्लीम महिला आंदोलन (बीएमएमए) संस्थेच्या स्थापनेला यंदा दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. गेल्या दहा वर्षांत ही संस्था नुसती टिकूनच राहिलेली नाही तर मुस्लीम समाजात, विशेषत: स्त्रियांमध्ये तिने विधायक बदल घडवून आणले आहेत. मुस्लीम स्त्रियांना संघटित होण्याची गरज काय? या प्रश्नांवर ही संस्था खणखणीत उत्तर बनली आहे. स्वत:साठी आणि समाजासाठीही मुस्लीम स्त्रियांनी पुढाकार घेणे किती महत्त्वाचे होते हे या संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत स्पष्ट झाले आहे..भारतीय मुस्लीम महिला आंदोलन संस्थेच्या या दहा वर्षांतील कामगिरीचा हा आढावा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय मुस्लीम महिला आंदोलनाची (बीएमएमए) स्थापना जानेवारी २००७ मध्ये नवी दिल्लीत झाली. तेव्हापासून एक प्रश्न अनेकांनी विचारला, ‘‘मुस्लीम स्त्रियांना संघटित होण्याची गरज काय? क्या जरूरत है मुसलमान औरतों को अपनी तहरीक तयार करने की?’’ आज बीएमएमएच्या स्थापनेला दहा वर्षे झाल्यानंतर उत्तर स्पष्ट आहे. मुस्लीम स्त्रियांनी पुढाकार घेणे किती महत्त्वाचे होते हे स्पष्ट झाले आहे. यामागे कारणे अनेक आहेत. अगदी सुरुवातीचा मुद्दा बघितला, तर कोणताही समाज त्यातील स्त्रियांना मागास ठेवून प्रगती करूच शकत नाही, त्याचप्रमाणे तिच्या प्रगतीसाठी समाजातील बहुसंख्य लोकांच्या मदतीची अत्यंत गरज असतेच. बीएमएमएने केवळ भारतीय मुस्लीम समाजातील उदारमतवादी आवाजाला पर्याय तयार केलेला नाही, तर कायद्यातील सुधारणांसारख्या संवेदनशील मुद्दय़ांना थेट हात घालून मुस्लीम स्त्रियांना पुढे आणले आहे.

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian muslim woman indian muslim women empowerment muslim women
First published on: 25-02-2017 at 02:54 IST