उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याचा अंश कमी होत असल्याने वेगवेगळ्या पेयांद्वारे शरीरातील पाणी टिकवून ठेवता येते. त्यासाठी उसाचा रस, लिंबाचे, कोकमाचे सरबत, पन्हे, नीरा, चिंचेचे पन्हे, जलजिरा असे अनेक नैसर्गिक पदार्थ वापरून केलेले पर्याय उपलब्ध आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जलजिरा
उन्हाळ्यामध्ये थंडावा देणारे अत्यंत उपयुक्त असे हे पेय घरच्या घरी बनवता येणारे आणि विविध फायदे देणारे आहे. जिरा पूड, आले, काळे मीठ, पुदिना, आमचूर पूड इत्यादी अनेक पदार्थ कमी-जास्त प्रमाणात त्यात वापरून जलजिरा बनवले जाते. जलजिऱ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध पदार्थानुसार त्याचे गुणधर्म बदलत जातात. जलजिऱ्यामुळे शरीराला थंडावा तर मिळतोच परंतु शरीरातली उष्णताही कमी होते. पचनाच्या तक्रारी दूर होतात. अपचन, गॅसेस, बद्धकोष्टता तसेच भूक न लागणे या तक्रारींवर सर्वात उत्तम उपाय म्हणजे जलजिरा!

मराठीतील सर्व ऋतु बरवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Healthy drinks in summer
First published on: 28-05-2016 at 01:30 IST