पितृपंधरवडा म्हणजे खाण्याच्या पदार्थाचे भरपूर वैविध्य. खूप प्रकारच्या भाज्या व खूप प्रकारचे इतर अनेक पदार्थ खाण्यात येतात. त्यातही कोहळा, वेगवेगळ्या शेंगा, भेंडीची भाजी, खीर, वडे, कढी हे पदार्थ असतातच. सर्व प्रकारच्या हिरव्या भाज्या व फळभाज्यासुद्धा या काळात खाण्यामध्ये येतात. काही भाज्या इतर वेळी फारशा खाण्यात येत नाही किंवा मिळतही नाहीत त्या भाज्यासुद्धा पितृपंधरवडय़ात किंवा या दिवसांमध्ये खाण्यात येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पाऊस थोडा कमी झाल्यानंतर वातावरणातील उष्णता थोडी थोडी वाढत जाते. वातावरणात पुन्हा बदल झाल्याने जंतुसंसर्गाची शक्यता जास्त असते. त्यामुळेच नेहमीपेक्षा भरपूर पालेभाज्या, फळभाज्या खाल्ल्याने आणि त्यात वैविध्य असल्याने भरपूर आणि सर्व प्रकारची जीवनसत्त्वे त्यातून आपल्याला मिळतात. अशा प्रकारच्या जीवनसत्त्वामुळे जंतुसंसर्गापासून बचाव होऊ शकतो.

मराठीतील सर्व ऋतु बरवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remember that fathers pitrpandharavada
First published on: 24-09-2016 at 01:22 IST