येथील सरकारी शाळेतील हातपंपाचे पाणी प्यायल्याने ५५ विद्यार्थिनी आजारी पडल्या. यातील ४८ विद्यार्थिनींना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तर सात जणींना मुजफ्फरपूर येथील श्रीकृष्ण मेडिकल कॉलजेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विषबाधेमुळे ही घटना घडल्याचा संशय सूत्राने व्यक्त केला आहे.
थहार गावातील कस्तुरबा गांधी विद्यालयात शुक्रवारी हा प्रकार झाला.  यातील ४८ विद्यार्थिनींवर प्राथमिक उपचार केंद्रात उपचार सुरू असून सात विद्यार्थिनींना श्रीकृष्ण मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.