जम्मू-काश्मीरला वेगळा दर्जा देणारे ३७० कलम रद्द केले तर त्यामुळे मोठी अनागोंदी माजेल व भाजपचा असा कुटील डाव असल्याची भीती आपल्याला वाटते असे मत माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी व्यक्त केले. गेल्या चाळीस वर्षांत ते प्रथमच प्रचारातून दूर असले तरी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आहेत. गेले तीन महिने ते उपचारासाठी लंडनला आहेत. भाजप कलम ३७० रद्द करील व त्यामुळे महात्मा गांधी यांनी व भारत सरकारने दिलेल्या वचनाचा भंग होईल असे सांगून ते म्हणाले की, भाजप हे कलम रद्द करण्यासाठी काहीही करू शकते असा आरोपही केला.