लोकसभेत सरकारविरोधात पहिल्यांदाच अविश्वास ठराव आणला गेला आहे. त्यानंतर लोकसभेत यावर चर्चा सुरु आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चर्चेदरम्यान भाजपावर टीकेचे ताशेरे झाडले. राहुल गांधी यांचे हे भाषण इतके वादळी ठरले की लोकसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित करावे लागले. कामकाज स्थगित करण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी आपले मुद्दे मांडले. देशात महिला अत्याचार, जमावाकडून मारहाणीच्या घटना वाढत आहेत मात्र त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचक मौन बाळगले आहे. ते अशा घटनांबाबत काहीही बोलत नाहीत असा आरोप राहुल गांधी यांनी केला. For the 1st time in the history of India, women are not being protected. Wherever you see, Dalit, Adivasis, minorities are being thrashed, killed, but Prime Minister can't speak a word. Are these minorities, Adivasis, women not a part of India: Rahul Gandhi. #NoConfidenceMotion pic.twitter.com/zlCKO5tDes — ANI (@ANI) July 20, 2018 इतिहासात पहिल्यांदाच अशी प्रतिमा झालीये की भारत आपल्या महिलांची रक्षा करु शकत नाहीये. अल्पसंख्याक, महिलांवर अत्याचार होत असताना पंतप्रधानांच्या तोंडून एक शब्द निघत नाही अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. एवढेच नाही तर माझ्या भाषणादरम्यान जेव्हा लोकसभेचे कामकाज काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते तेव्हा एनडीएच्या काही घटक पक्षांनी येऊन माझे अभिनंदन केले असेही राहुल गांधी यांनी म्हटले. तसेच भाजपा, संघाचे लोक मला पप्पू समजतात मात्र माझ्या मनात त्यांच्याबाबत जराही तिरस्कार नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. Aap logon ke andar mere liye nafrat hai, aap mujhe Pappu aur bohot gaaliyan dekar bula sakte hain, lekin mere andar aapke liye nafrat nahi hai: Rahul Gandhi. He then walks up to PM Modi and gives him a hug #NoConfidenceMotion pic.twitter.com/w5DqyR7mVu — ANI (@ANI) July 20, 2018