बाबरी मशीद अजूनही त्याच जागी आहे, होती आणि राहिल तसेच सुप्रीम कोर्टाचा निकाल जर आमच्या बाजूने आला तर आम्ही ती पुन्हा त्याच ठिकाणी उभारणार. कोर्टाचा निकालही येईल तो केवळ पुराव्यांच्या आधारावर येईल आस्थेच्या नव्हे, अशी आम्हाला आशा वाटते, असे एमआयएमचे अध्यक्ष असुदुद्दिन ओवेसी यांनी म्हटले आहे. ते दिल्लीत एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते.
Hamari masjid wahan par hai, thi, aur inshaallah rahegi aur dubara wahan par banayenge, jab Supreme Court hamare haath mein faisla dega. Aur faisla aayega to humko puri ummid hai, ki aastha ke buniyad par nahin, evidence ke buniyad par aayega: Asaduddin Owaisi in #Delhi pic.twitter.com/Vi59JVsdEp
— ANI (@ANI) February 24, 2018
ओवेसी म्हणाले, आम्ही हिंदू-मुस्लिम भाई-भाईच्या खूप घोषणा दिल्या. मात्र, तरीही आम्हाला या देशात दुसऱ्या दर्जाचे नागरिक बनवण्याची स्वप्न काही लोक पाहत आहेत, त्यांच्यामुळे आम्ही मुसलमान तर झालोच नाही मात्र, ते हिंदू राष्ट्राच्या दिशेने जरूर गेले आहेत.
Jo aaj bhi humko Pakistani kehkar pukarte hain, main unse puchna chahta hu. Harshad Mehta, Ketan Parekh, Nirav Modi kya musalman the? Hamare wazir-e-azam ne ek bhai ko kaha -Mehul Bhai, kya wo musalman the? Aapne jisko bhai kaha, wahi to lut kar bhaag gaya hai: Asaduddin Owaisi pic.twitter.com/66kEGCySe0
— ANI (@ANI) February 24, 2018
जे आजही आम्हाला पाकिस्तानी म्हणून हिणवतात त्यांना मला विचारायचे आहे की, हर्षद मेहता, केतन पारेख आणि नीरव मोदी हे मुसलमान होते का? आमच्या पंतप्रधानांनी एकाला मेहुल भाई असे संबोधले, ही व्यक्ती मुसलमान होती का? असे सवाल यावेळी ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींना केला.
हे लोक आम्हाला घाबरवत आहेत. आमच्या शरियतविरोधात ते आवाज उठवत आहेत. आम्हाला बाबरी मशीदीवरील हक्क ते सोडायला सांगत आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की, आम्ही आमची मशीद कदापी सोडणार नाही, असेही ओवेसी यावेळी हिंदुत्ववाद्यांवर टीका करताना म्हणाले.