* तब्बल ८२१ वर्षांनंतर नालंदा येथील विद्यापीठ पुन्हा एकदा सुरू (१.९.२०१४), कुलपती म्हणून डॉ. गोपा सबरवाल यांची नियुक्ती, मूळ नालंदा विद्यापीठाचे अवशेष असलेल्या जागेपासून १० किलोमीटर अंतरावर नवीन वास्तूवर हे विद्यापीठ सुरू
* देशातील २९ वे राज्य म्हणून तेलंगण राज्याची निर्मिती (२.६.२०१४)
* सलग दुसऱ्या वर्षी भारत हा पोलिओमुक्त असल्याचे जाहीर (२७.३.२०१४)
* संसदेमध्ये न्यायिक नियुक्ती, जागले संरक्षण, किशोर न्याय अधिनियम, लोकपाल विधेयक आदींना मंजुरी
* गुजरातमधील पाटन येथे ११ व्या शतकात बांधल्या गेलेल्या राणी की बाव (राणीची विहीर) आणि कुलू (हिमाचल प्रदेश) येथील ग्रेट हिमालयीन पार्क या दोन स्थळांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश
* मुंबईत वडाळा ते चेंबूरदरम्यान देशातील पहिली मोनो रेल्वे सुरू तसेच, काश्मीरमध्ये वैष्णवदेवीच्या पायथ्यापर्यंत जाऊ शकणारी कटरा-उधमपूर श्रीशक्ती एक्सप्रेस सुरू
* शिक्षक दिनाचे औचित्य साधून पंतप्रधानांचा मुलांशी आणि शिक्षकांशी थेट संवाद, त्यानंतर आकाशवाणीच्या माध्यमातून महिन्यातून एकदा मन की बात या कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद
* जम्मू-काश्मीर राज्यात जलप्रलय, भारतीय लष्कराच्या ऑपरेशन मेघ-राहतद्वारे अडीच लाख विस्थापितांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यश