मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दिल्लीतील इंडिया गेट या भागात EarthHour पाळण्यात आला. त्यामुळे काही वेळासाठी दिवे घालवण्यात आले. एक तासासाठी हे दिवे घालवण्यात आले. जगभरातील उर्जासंबंधी आणि पर्यावरणसंबंधी काळजी असलेल्या लोकांकडून ही मोहीम दरवर्षी राबवण्यात येते

ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यासाठी जगभरात रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत अर्थ अवर पाळण्यात आला. दिल्ली आणि मुंबईतही अर्थ अवर पाळण्यात आला. सोशल मीडियावरही या अर्थ अवरची चांगलीच चर्चा आहे. दिल्ली, मुंबईसह इतर प्रमुख शहरांमध्ये आणि संपूर्ण जगभरात हा अर्थ अवर पाळण्यात आला.