लोकसभा निवडणुकीमुळे सध्या देशातील राजकीय वातावरण तापले असून मार्च महिन्यात निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. तीन राज्यांमधील पराभवामुळे भाजपा बॅकफूटवर असून दुसरीकडे काँग्रेसच्या गोटात उत्साह संचारला आहे. शरद पवार यांच्या पुढाकाराने महाआघाडीचे प्रयत्न देखील सुरु झाले आहेत. निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून या निवडणुकीसंदर्भात तुम्हाला काय वाटते, मोदी सरकारची पाच वर्षांमधील कामगिरी समाधानकारक आहे का?, याबाबत मांडा तुमचे मत लोकसत्ता.कॉमच्या ऑनलाइन पोलमध्ये…