२०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी प्रधानमंत्री जन धन योजना आमंलात आणली होती. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला या योजनेला चार वर्षं पूर्ण होणार आहेत. याचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून जन धन खातेधरकांना मोठं गिफ्ट देणार असल्याचे वृत्त आहे. गेल्या चार वर्षांत 32 कोटी 25 लाख जन-धन खाती उघडण्यात आली असून त्यात 80 हजार 674 कोटी रुपये जमा आहेत.

सहा महिने जन धन खाते वापरण्यात सातत्य राहिल्यास बँकेकडून खातेदारांना मिळणारे कर्जाची मर्यादा मोदी सरकार वाढवणार आहे. सध्या ५ हजार रूपये मिळणारे कर्ज दुप्पट होणार आहे. त्यामुळे सहा जन धन खाते वापरल्यास खातेदारांना १० हजार रूपयांचे कर्ज मिळू शकते. याशिवाय अटल पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्तीवेतनाची मर्यादाही दुपट्ट होणार आहे. ही मर्यादा 5 हजार रुपयांवरून दहा हजार रुपये होऊ शकते.

Narendra Modi Sharad Pawar
“यूपीए सरकारचे कृषीमंत्री दिल्लीत पॅकेज घोषित करायचे, पण ते पैसे…”, पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल
Congress Promising 5000 Rs per month for poor families
“गरीब कुटुंबांना दरमहा ५,००० रुपये देणार”, निवडणुकीआधी काँग्रेसची मोठी घोषणा; म्हणाले, “हे आश्वासन नाही, तर…”
Arind Kejriwal
“मला नोबल पुरस्कार मिळाला पाहिजे”, अरविंद केजरीवालांचं विधान चर्चेत, म्हणाले…
Modi government rejected Shiv Senas suggestion to make Swaminathan President says Uddhav Thackeray
‘‘मोदी सरकारने स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करण्याची शिवसेनेची सूचना नाकारली होती,” उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट; म्हणाले, “आमचे सरकार आले तर…”

याशिवाय या वर्षीच्या भाषणामध्ये पंतप्रधान मायक्रो इन्शूरन्स स्कीमची घोषणा करण्याची शक्यता आहे. रुपे कार्डधारकांना मिळणाऱ्या मोफत दुर्घटना विम्याची रक्कम 1 लाख रुपयांनी वाढवण्याचा विचारही सरकार करत आहे.