प्रख्यात कवी आणि एकेकाळी आम आदमी पक्षाचा प्रमुख चेहरा राहिलेले कुमार विश्वास यांनी भारतीय वायूसेनेच्या शौर्याचे कौतुक करत टीकाकारांवर निशाणाही साधला आहे. यावेळी पुरावे मागणाऱ्यांच्या हातात काही ग्रॅम बॉम्ब ठेवले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.