गुजरात दंगलीतील बिल्कीस बानो हत्याकांड प्रकरणातील ११ आरोपींची शिक्षा पूर्ण होण्याआधीच त्यांना सोडण्यात आलं. याप्रकरणावरून देशभरात बराच गदारोळ झाला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. गुजरात दंगल प्रकरणातील नरोडा पाटीया हत्याकांडातील प्रमुख आरोपी भाजपाच्या माजी मंत्री माया कोडनानी आणि बजरंग दलाचे माजी नेते बाबू बजरंगी, विश्व हिंदू परिषदेचे नेते जयदीप पटेल यांच्यासह ६९ आरोपींची निर्दोष मुक्ता करण्यात आली आहे. अहमदाबादच्या विशेष कोर्टाने हा निर्णय दिला आहे. न्यायाधीश एस. के. बक्षी यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.

२००२ साली गुजरातमध्ये दंगल उसळली होती. २७ फेब्रुवारी २००२ मध्ये उसळलेल्या दंगलीत इतर ९ ठिकाणीही दंगल झाली होती. यापैकी एक दंगल म्हणजे नरोडा गाम येथे उसळलेला हिंसाचार. या हिंसाचारात मुस्लिम मोहल्ला आणि कुंभार वास येथील घरांना पेटवण्यात आले होते. यावेळी ११ मुस्लिमांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

Who killed Akshay Shinde Encounter Badlapur Sexual Assault Case Update in Marathi
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस अधिकारी कोण? चकमकफेम प्रदीप शर्मांबरोबर केलं होतं काम
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
ujjwal nikam on akshay shinde encounter
“या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी नक्कीच होईल, कारण…”; अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी उज्वल निकम यांची प्रतिक्रिया!
police file case against workers for stolen jewellery worth rs 32 lakh from shop
सराफी पेढीतून ३२ लाखांचे दागिने चोरून कारागिर पसार; रविवार पेठेतील घटना
Dhananjay Chandrachud
D Y Chandrachud : “…तर मी तुम्हाला हाकलून देईन”, सरन्यायाधीशांनी ममता बॅनर्जींच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला सुनावलं
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
Girls, hotel room, meet friend, High Court,
मुलींनो, मित्राला भेटायला थेट हॉटेलच्या खोलीत जाऊ नका.. उच्च न्यायालयाचा सल्ला!
Two girls sexually assaulted by father in Versova Mumbai news
दोन मुलींवर पित्याकडून लैंगिक अत्याचार; वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

परंतु, याप्रकरणी २०१० मध्ये खटला दाखल करण्यात आला. या खटल्याच्या जलद सुनावणीसाठी विशेष न्यायालयाचीही स्थापना करण्यात आली होती. परंतु, तरीही याप्रकरणी १३ वर्षे खटला सुरू राहिला. यावेळी ५२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. या न्यायालायने ५ एप्रिल रोजी सुनावणीची कार्यवाही पूर्ण केली होती. या खटल्यातील ८६ आरोपींपैकी १७ आरोपींचे सुनावणीदरम्यान निधन झाले. त्यामुळे उर्वरित ६९ आरोपींविरोधात खटला सुरू होता. हे सर्व आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. या खटल्यामध्ये जवळपास १८२ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली.

आरोपींची निर्दोष सुटका झाल्याचे कळताच त्यांच्या समर्थकांनी कोर्टाबाहेर “जय श्रीराम आणि भारत माता की जय” च्या घोषणा दिल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.