Atiq Ahmed Killed: कुख्यात गँगस्टर अतिक आणि अशरफ अहमद या दोघांची प्रयागराजमध्ये काल (१५ एप्रिल) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माध्यम प्रतिनिधींच्या घोळक्यात पत्रकार असल्याचे भासवत या हल्लेखोरांनी दोघांवर हल्ला केला. या प्रकारामुळे पत्रकारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. भविष्यात पुन्हा अशा घटना घडू नये याकरता केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून लवकरच पत्रकारांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्वे आणि मानक कार्यप्रणाली (Guidelines and Standard Operating Procedures) जारी करण्यात येणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

हेही वाचा >> Who killed Atiq Ahmed : पत्रकार बनून आलेले हल्लेखोर? अतिकला गोळ्या घालून दिल्या घोषणा, पोलीस म्हणाले…

Delhi High Court whatsapp hearing
व्हॉट्सॲप बंद होणार? केंद्र सरकारच्या मागणीचा विरोध, दिल्ली उच्च न्यायालयात काय घडलं?
pension for government employees
लेख : सामाजिक कल्याणाकडे दुर्लक्ष
Sales of e-vehicles pune
गडकरींनी वारंवार सांगूनही लोकांनी फिरवली पाठ! ई-वाहनांच्या विक्रीला गती मिळेना
CJI DY Chandrachud
केंद्रीय तपास यंत्रणांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा मोलाचा सल्ला; म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित…”

शनिवारी (१५ एप्रिल) संध्याकाळी अतिक आणि अशरफ यांना अस्वस्थ वाटू लागल्याने एसएचओ मौर्या यांच्या नेतृत्वाखालील २० पोलिसांच्या पथकाच्या सुरक्षेत त्यांना मोतीलाल नेहरू झोनल हॉस्पिटलमध्ये (कॉल्विन) वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात होते. यावेळी पोलिसांच्या पथकात सात उपनिरीक्षक आणि १३ हवालदारांचा समावेश होता. हॉस्पिटलच्या गेटवर माध्यमांना पाहिल्यानंतर अतिक आणि अशरफ हळू चालायला लागले. यावेळी पत्रकारांनी दोघांनाही प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. माध्यमांचे कॅमेरे दोघांकडे लागलेले होते. तेवढ्यात पत्रकारांच्या गर्दीत असलेल्या दोघांनी अतिक आणि अशरफवर गोळ्या झाडल्या. त्यांच्या डोक्यावर गोळी लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर दोन्ही हल्लेखोर आणि त्यांचा साथीदार पोलिसांना शरण गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लोखोर दुचाकीने आले होते. घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून एक व्हिडीओ कॅमेरा जप्त केला. तसंच तिथे एका वृत्तवाहिनीचाही लोगो त्यांना सापडला आहे. दरम्यान, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी दावा केला आहे की, हल्लेखोरांनी अतिक आणि अशरफवर गोळीबार केल्यानंतर तिथे ‘जय श्री राम’च्या घोषणाही दिल्या होत्या.

हेही वाचा >> का केली अतिक-अशरफ अहमदची हत्या? हल्लेखोरांनी पोलीस तपासात सांगितलं कारण; दोघा भावांचा करत होते पाठलाग!

उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची होणार बैठक

या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकारांची सुरक्षा धोक्यात आली आहे. कार्यक्रम, सभा, प्रचार रॅली कव्हर करण्याकरता पत्रकार एकत्र जमत असतात. त्यामुळे त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. पत्रकारांना सुरक्षा पुरवण्याकरता लवकरच मार्गदर्शक तत्वे जारी केली जाणार आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत मार्गदर्शक तत्त्वांबाबत चर्चा केली जाणार आहे. त्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील.