पीटीआय, लखीमपूर

नरेंद्र मोदी सरकारच्या काळात चीनने भारताच्या एक इंच जमिनीवरही अतिक्रमण केलेले नाही, असे स्पष्ट करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर टीका केली. १९६२मधील चीन आक्रमणाच्या काळात नेहरूंनी अरुणाचल आणि आसामला कसे ‘बाय-बाय’ केले होते, हे लोक विसरलेले नाहीत, असे शहा म्हणाले.

ajit pawar meets amit shah in delhi ahead of assembly polls in maharashtra
शहांच्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता?अजित पवारांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा
pm narendra modi remarks criticising opposition alleging suppressing my voice
Budget 2024 : ‘मध्यमवर्गाचे सशक्तीकरण करणारा अर्थसंकल्प’, पंतप्रधान नरेंद्र मोदींची अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया
Congress taunts Prime Minister after Sarsangh leader mohan bhagwat remark from Nagpur
नागपूरहून अग्नी क्षेपणास्त्राचा मारा’; सरसंघचालकांच्या टिप्पणीनंतर काँग्रेसचा पंतप्रधानांना टोला
Court objects to remarks against former Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao
‘केसीआर’ यांच्याविरोधातील शेरेबाजीला न्यायालयाचा आक्षेप; चौकशी समितीच्या अध्यक्षांची कानउघाडणी, बदली
Atal Bihari Vajpayee NDA no common minimum programme or convener on the table in Modi NDA
ना किमान समान कार्यक्रम ना समन्वयक! आताची एनडीए वाजपेयींच्या काळापेक्षा वेगळी कशी?
Sanjay Raut on Pm Narendra Modi Speech
‘बालबुद्धीच्या नेत्यानेच मोदींना घाम फोडला’, संजय राऊतांची पंतप्रधानांवर टीका
Rahul Gandhi debut as Leader of the Opposition first speech aggression
राहुल गांधींच्या भाषणावर मोदी-शाहांसह सत्ताधाऱ्यांनी का नोंदवला आक्षेप?
Rahul Gandhi criticizes Prime Minister Narendra Modi government policies BJP
लोकसभेत धुमश्चक्री; राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

लखीमपूर येथे प्रचारसभेत बोलताना शहा म्हणाले, ‘‘केंद्रातील भाजप सरकारने बांगलादेशाबरोबरच सीमा संरक्षित केली आणि तेथून होणारी घुसखोरी थांबवली आहे. चीनच्या १९६२च्या आक्रमणावेळी नेहरू यांनी आसाम आणि अरुणाचल प्रदेशला बाय-बाय केले होते, ही गोष्ट या राज्यातील लोक विसरू शकत नाहीत. पण आता चीन भारताच्या एका इंच जमिनीवरही अतिक्रमण करू शकत नाही. किंबहुना डोकलाममध्ये आम्ही चीनला मागे रेटले.’’

हेही वाचा >>>महिला वकिलासोबत ३६ तासांचा Video कॉल, नार्कोटिक्स चाचणीची बतावणी आणि नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करून खंडणीची मागणी!

आसामची बांगलादेशशी असलेली सीमा घुसखोरीसाठी आधीपासून खुलीच ठेवली होती, पण नंतर केंद्रात मोदी सरकार आले आणि आसाममध्ये हिमंता बिस्व सरम यांचे सरकार आले. त्यामुळे आता सीमेवरून होणारी घुसखोरी थांबली आहे, असा दावा शहा यांनी केला.

आसाममधील यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने राज्यावर अन्याय केला आणि विविध हिंसक तसेच बंडखोरीशी संबंधित विविध घटनांमध्ये असंख्य तरुण मारले गेले. परंतु गेल्या १० वर्षांत मोदी सरकारच्या काळात नऊ हजार तरुण शरण आले आहेत, असेही शहा म्हणाले.