गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे राजकारण व्यक्तिकेंद्रित असून ते देशाच्या हिताचे नाही, ही काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेली टीका हास्यास्पद असल्याचे भाजपने म्हटले आहे. ज्या पक्षाने घराणेशाहीचे राजकारण केले आणि नेहमी आपल्या कुटुंबीयांचेच हित जपले, त्या पक्षाकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार, असेही भाजपने म्हटले आहे.
देशाला आता बदल हवा असून राहुल गांधी यांची क्षमता आणि बुद्धिमत्ता देशाने जोखली आहे आणि ती फेटाळलीही आहे, असे भाजपचे नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष घराणेशाहीवरच चालला असून विशिष्ट कुटुंबीयांसाठीच निर्णय घेतले जात आहेत तो पक्ष देशाच्या हिताचा विचार करू शकत नाही, असे भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्या नावाची घोषणा होईल. कारण काँग्रेस पक्ष गांधी कुटुंबीयांच्या पलीकडे विचारच करू शकत नाही अशी टीकाही केली.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2014 रोजी प्रकाशित
‘व्यक्तिकेंद्रित राजकारणाबद्दलचे राहुल गांधींचे विधान हास्यास्पद’
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे राजकारण व्यक्तिकेंद्रित असून ते देशाच्या हिताचे नाही, ही काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेली टीका हास्यास्पद असल्याचे भाजपने म्हटले आहे.
First published on: 15-01-2014 at 12:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp criticises rahuls remarks on modi