भारत आणि चिनी सैन्यात सिक्किम सीमेवरील डोक्लाममध्ये दोन महिन्यांपासून जोरदार संघर्ष सुरु आहे. भारत आणि चीनमधील तणाव वाढला असताना पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. याशिवाय पाकिस्तानकडून अनेकदा घुसखोरीचे प्रयत्नदेखील सुरु आहेत. एका बाजूला पाकिस्तानी सैन्याकडून आक्रमक भाषा वापरली जात असताना, दुसरीकडे मोदी सरकारच्या अण्वस्त्र धोरणातील बदलांमुळे पाकिस्तानच्या थिंक टँकला चिंता मोठी सतावते आहे. पाकिस्तानच्या ‘डॉन’ या वृत्तपत्राने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘भारताने अण्वस्त्र धोरणात केलेले बदल पाकिस्तानसाठी धोकादायक ठरु शकतात,’ असे डॉनने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या लेखात म्हटले आहे. सेंटर फॉर इंटरनॅशनल स्ट्रॅटर्जिक स्टडीजने (सीआयसीसी) भारताच्या अण्वस्त्र धोरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. सीआयसीसीमध्ये भारताच्या बदलत्या अण्वस्त्र धोरणाविषयी चर्चा झाली. थिंक टँक सीआयसीसीमधील सर्वच सदस्यांनी चर्चेदरम्यान भारताच्या बदललेल्या अण्वस्त्र धोरणाबद्दल भीती बोलून दाखवली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Change in india s nuclear policy could create security concerns for pakistan
First published on: 22-08-2017 at 17:51 IST