भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा याच वर्षी जानेवारी महिन्यात संपला. कन्याकुमारीपासून सुरु झालेली ही यात्रा काश्मीरमध्ये संपली. आता भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होतो आहे. लवकरच हा टप्पा सुरू होणार असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वातच ही यात्रा निघणार आहे.मुंबई काँग्रेसने ट्विट करून याविषयीची माहिती दिली आहे. राहुल गांधींची ही यात्रा अरूणाचल प्रदेश ते महाराष्ट्र अशी असणार आहे. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यात ‘मोहब्बत की दुकान’चा नारा दिला होता. आता दुसऱ्या टप्प्यात ते काय नारा देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होण्याआधी काय घडलं आहे?

भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा सुरू होण्याआधी विरोधकांची आघाडी तयार झाली आहे. या आघाडीला इंडिया हे नाव देण्यात आलं आहे. इंडिया आघाडीच्या तीन बैठकाही पार पडल्या आहेत. पहिली बैठक पाटणा, दुसरी बंगळुरू तर तिसरी बैठक मुंबईत पार पडली आहे. तसंच या बैठकीत २७ पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत. भारत जोडो यात्रा सुरू होण्याआधीच मणिपूरचं गंभीर प्रकरण घडून गेलं आहे. तसंच पावसाळी अधिवेशनही पार पडलं आहे. त्याचप्रमाणे राहुल गांधी यांची गेलेली खासदारकीही त्यांना परत मिळाली आहे. या सगळ्या मुद्द्यांचा समावेश या यात्रेत होऊ शकतो.

regional discrimination, textile industry policy,
सांगली : वस्त्रोद्योग धोरणात प्रादेशिक भेदभावाचा आरोप, पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय – किरण तारळेकर
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Narendra modi fintech india marathi news
भारताच्या ‘फिनटेक’ वैविध्याचा जगाला मोह – पंतप्रधान
cm Eknath shinde
कामचुकार ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे, मुंबई – गोवा महामार्गाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांचे निर्देश
State wide strike of food grains traders suspended Pune print news
अन्नधान्य व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी बंद स्थगित
rohit pawar
Rohit Pawar : राज्यातील महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून रोहित पवारांचं पंतप्रधान मोदींना पत्र; म्हणाले, “उद्या महाराष्ट्रात येत आहात, तर…”
Anil Deshmukh, Shakti Act,
महाराष्ट्रात ‘शक्ती’ कायद्याला केंद्रामुळे विलंब? माजी गृहमंत्र्यांनी थेटच…
Ajit Pawar life threatened
Ajit Pawar life threatened: “माझ्या जीवाला धोका, पण…”, गुप्त वार्ता विभागाच्या अहवालाचा हवाला देत अजित पवार यांचं महत्त्वाचं विधान

जुडेगा भारत जितेगा इंडिया

इंडिया हे नाव विरोधकांच्या आघाडीला दिल्यानंतर आता चर्चा सुरू झाली आहे ते इंडिया नाव जाऊन भारत हे नाव येण्याची. अशात काँग्रेसने जुडेगा भारत जितेगा इंडिया हा नारा दिला आहे. या नव्या नाऱ्याचे पडसादही नव्या टप्प्यात पाहण्यास मिळतील. तसंच विशेष अधिवेशनात सरकारने भारत हे नाव ठेवलं तर त्यावरूनही राहुल गांधी आणि काँग्रेस नेते टीका करण्यास सज्ज होतील.

नाना पटोले यांनी काय म्हटलं होतं?

“राहुल गांधींच्या दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडो यात्रेची सुरुवात झाल्यानंतर महाराष्ट्रातही आम्ही पदयात्रा काढणार आहोत. पूर्व विदर्भात माझ्या नेतृत्वात पदयात्रा काढली जाणार आहे. तर पश्चिम विदर्भात आमचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पदयात्रा काढणार आहेत. उत्तर महाराष्ट्रात बाळासाहेब थोरात, मराठवाड्यात अशोक चव्हाण, पश्चिम महाराष्ट्रात पृथ्वीराज चव्हाण आणि मुंबईत वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा निघणार आहे. कोकणातील पदयात्रेत आमच्या पक्षाचे सर्वच नेते सहभागी होतील. असं आमच्या पदयात्रेचं नियोजन आहे”, अशी माहितीही नाना पटोले यांनी मागच्या महिन्यात दिली होती.