गोव्यात काल (दि.२७) मध्यरात्री मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. यामध्ये महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगोप) विसर्जित करण्यात आला आणि त्याचे भाजपात विलिनिकरण झाले. मगोपचे आमदार मनोहर आजगांवकर आणि दिपक पावस्कर यांनी गोवा विधानसभा अध्यक्षांना एक पत्र लिहून मगोपचे भाजपात विलिनिकरण करीत असल्याची घोषणा केली. मात्र, पक्षाचे तिसरे आमदार सुदिन ढवळीकर यांनी या विलिनीकरणाच्या प्रस्तावावर सही केली नाही. ढवळीकर हे सध्या भाजपाच्या नेतृत्वाखालील गोवा सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत.
MGP MLAs Manohar Ajgaonkar & Deepak Pauskar in a letter to the Speaker of Goa Legislative Assembly: We have agreed to merge Maharashtrawadi Gomantak Legislative Party (MGP) with BJP. Total strength of Legislators of MGP is three members & we constitute 2/3rd of the members. pic.twitter.com/b2JWoX7SEi
— ANI (@ANI) March 26, 2019
३६ सदस्यांच्या गोव्याच्या विधानसभेत १४ सदस्य हे भाजपाचे आहेत. दरम्यान, राज्यात मगोपचे एकूण तीन आमदार आहेत आणि आम्ही दोन तृतीयांश सदस्य आहोत, असे आजगांवकर आणि पावस्कर यांनी पक्ष विसर्जित करताना म्हटले आहे. त्यानुसार, मंगळवारी मध्यरात्री १.४५ वाजता विधानसभा अध्यक्ष मायकल लोबो यांच्याकडे त्यांनी मगोपच्या विलिनीकरणाचे पत्र सोपवले. त्यानंतर आज (दि.२७) दुपारी १२ वाजता भाजपात दाखल झालेल्या या दोन्ही आमदारांचा शपथविधी होणार आहे.
Michael Lobo, Goa Dy Speaker&BJP MLA on merger of Maharashtrawadi Gomantak Legislative Party with BJP: MGP's legislative wing has split. 2/3rd of MGP legislators formed a separate group&they're merging it with BJP. All formalities as per Constitution of India have been completed. pic.twitter.com/DMszKPanbJ
— ANI (@ANI) March 26, 2019
मध्यरात्री घडलेल्या या मोठ्या राजकीय घडामोडीनंतर ३६ आमदारांच्या गोवा विधानसभेत आता भाजपाच्या आमदारांची संख्या १२ वरुन १४ झाली आहे. त्यामुळे भाजपाच्या आमदारांची संख्या काँग्रेस आमदारांच्या इतकी झाली आहे. मगोप २०१२ पासून भाजपाचा सहकारी पक्ष होता.
Goa CM Pramod Sawant on merger of Maharashtrawadi Gomantak Legislative Party with BJP: Two MGP MLAs Manohar Ajgaonkar & Deepak Pauskar have joined BJP for the stability of the government. Automatically, our strength has grown to 14. pic.twitter.com/ByF838ftOk
— ANI (@ANI) March 26, 2019
पक्षांतर बंदी कायद्यानुसार, पक्षाच्या कमीत कमी दोन तृतीयांश आमदारांनी जर एकाच वेळी पक्ष सोडला तर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द होत नाही. तर त्यांना एक विशेष गट म्हणून मान्यता दिली जाऊ शकते.