कोटा : राजस्थानच्या कोटा जिल्ह्यात लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणारी मोटार रविवारी पहाटे चंबळ नदीत कोसळून झालेल्या अपघातात नवऱ्यामुलासह ९ जण ठार झाले. चालकाला पेंग आल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.

 सवाई माधोपूर जिल्ह्यातील चौथ का बरवाडा खेडय़ातील हे वऱ्हाडी मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास मध्यप्रदेशातील उज्जैन येथे लग्न समारंभासाठी निघाले. इतर वऱ्हाडय़ांना घेऊन जाणारी एक बसही त्यांच्यासोबत होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास, चालकाला पेंग आल्यामुळे त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि नयापुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुलावरून चंबळ नदीत कोसळली, अशी माहिती पोलीस अधीक्षक केसर सिंह शेखावत यांनी दिली.

254 people were rescued by the fire brigade in the flooded areas pune
रात्र दिन आम्हा युद्धाचा प्रसंग; २५४ जणांची अग्निशमन दलाकडून सुटका
molestation case, key seller, police, vasai
‘त्या’ चावी विक्रेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल, पोलिसांनी सूडबुध्दीने कारवाई केल्याचा आरोप
Khadakwasla dam and bhide bridge
Video : “भिडे पूल पाण्याखाली गेल्याशिवाय पुणेकरांचा पावसाळा सुरु होत नाही”; खडकवासल्याचे दरवाजे उघडले; नदीपात्राचा रस्ता बंद
husband, alcohol, wife murder husband,
पती दारू पिऊन द्यायचा त्रास, संतापलेल्या पत्नीने कोंबडी कापण्याची सुरी उचलली आणि…
Panvel Rural Areas, Panvel Rural Areas Face Power Outage, Mahavitaran Company , panvel news, loskatta news, marathi news
विजेच्या तारा तुटल्याने चार गावे १० तास विजेविना
Crime news baghpat murder
मुलीच्या प्रियकराला तिच्या कुटुंबानेच संपवलं, व्हिडीओ कॉल करुन बोलवलं आणि…
Ayodhya Women Falls In Pothole Viral Video
अयोध्येत ८४४ कोटी खर्च करून बांधलेल्या रस्त्यावर खड्डा? ४८ वर्षीय मारिया पडल्याने होतेय भयंकर टीका, पण ही महिला आहे तरी कोण?
lpg cylinder caught fire in mauli palkhi ceremony
माउलींच्या पालखी सोहळ्यात सिलेंडरने घेतला पेट;अग्निशमन दलाच्या जवानांकडून वेळीच आग आटोक्यात

या अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर बचावकार्य हाती घेण्यात आले. अपघातग्रस्त मोटार पाण्यात सात ते आठ फूट खोल बुडाली होती. सुरुवातीला ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि दोन मृतदेह नंतर हाती लागले.

लोकसभेचे अध्यक्ष आणि कोटा- बुंदीचे खासदार ओम बिर्ला व मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अपघातातील जीवहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख रुपये, तर ज्या कुटुंबातील दोन किंवा त्याहून अधिक सदस्य अपघातात मरण पावले आहेत, त्यांना ५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.