सातत्याने होणारे अतिक्रमण, जमिनींचा अनधिकृत ताबा आणि राज्य शासनाचे जमिनींवरील अधिकार यामुळे लष्कराचे गोळाबारीचे सराव क्षेत्र वर्षांगणिक आक्रसत आहे, अशी टीका संरक्षणमंत्री ए़  के.अँटोनी यांनी सोमवारी येथे केली़  लोकसभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होत़े
याबद्दल अधिक माहिती देताना संरक्षणमंत्री म्हणाले, २००९ साली लष्कराकडे १०४ गोळाबारीची सराव क्षेत्र होती़  त्यापैकी ३८ क्षेत्र लष्कराच्या वापरासाठी उपलब्धनाहीत किंवा अनेकदा प्रयत्न करूनही राज्य शासनाकडून ती पुनर्अधिसूचित करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे ही क्षेत्र सराव क्षेत्र आरक्षणाच्या यादीतून वगळण्यात आली आहेत़  गोळीबाराच्या सरावाच्या ठिकाणी पडलेले भंगार साहित्य अनधिकृतरीत्या जमा करण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत १० नागरिकांना जीव गमवावा लागल्याची माहितीही अँटोनी यांनी या वेळी दिली़  
तसेच सुरक्षा धोरणाचा भाग म्हणून पेन ड्राइव्ह, इंटरनेट आदी गोष्टींवरही लष्करात बंदी घालण्यात आली आह़े  सैन्यात सायबर सुरक्षेचे धोरण कटाक्षाने पाळण्यात येत असल्याचेही  संरक्षणमंत्र्यांनी सांगितल़े